Reliance: आकाश अंबानींपेक्षा अनंत अंबानी हेच का असतात नेहमी चर्चेत?

मुंबई तक

Anant Ambani and Akash Ambani: अनंत अंबानी हे सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये कायम चर्चेत असतात. पण त्यांचे मोठे बंधू आकाश अंबानी हे मात्र फारस चर्चेत नसतात. जाणून घेऊया दोघांविषयी सविस्तरपणे.

ADVERTISEMENT

आकाश अंबानींपेक्षा अनंत अंबानी हेच का असतात नेहमी चर्चेत?
आकाश अंबानींपेक्षा अनंत अंबानी हेच का असतात नेहमी चर्चेत?
social share
google news

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचे दोन्ही मुलं, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी, हे दोघेही रिलायन्सच्या व्यवसायात महत्त्वाच्या भूमिका बजावतात. पण गेल्या काही वर्षांपासून अनंत अंबानी हे त्यांचे मोठे भाऊ आकाश अंबानींपेक्षा जास्त चर्चेत राहताना दिसतात. नुकतेच अनंत अंबानींनी जामनगर ते द्वारका पदयात्रेदरम्यान 250 कोंबड्या खरेदी करून त्यांना कत्तलखान्यात जाण्यापासून वाचवल्याने ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दुसरीकडे, आकाश अंबानी रिलायन्स जिओसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात काम करत असूनही तुलनेने कमी चर्चेत असतात. यामागील कारणे आणि दोघांमधील तुलनात्मक फरक याचा सविस्तर आढावा घेऊया.

आकाश आणि अनंत अंबानी: एक तुलनात्मक दृष्टिकोन

आकाश अंबानी: व्यवसायातील स्थिरता आणि कमी प्रसिद्धी

आकाश अंबानी हे मुकेश अंबानी यांचे मोठे चिरंजीव असून, त्यांचा जन्म 23 ऑक्टोबर 1991 रोजी झाला. त्यांनी धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून प्राथमिक शिक्षण घेतले आणि नंतर अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीमधून अर्थशास्त्रात पदवी मिळवली. आकाश सध्या रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडचे अध्यक्ष आहेत आणि रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडच्या बोर्डावर संचालक म्हणूनही कार्यरत आहेत. रिलायन्स जिओच्या मेसेजिंग, चॅट आणि इतर सेवांवर त्यांचे लक्ष असते. त्याशिवाय, आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनातही त्यांची महत्त्वाची भूमिका आहे.

हे ही वाचा>> अनंत अंबानींनी रस्त्यावरच खरेदी केला कोंबड्यांचा ट्रक, पण सोशल मीडियावर मात्र...

आकाश अंबानी यांनी 2019 मध्ये त्यांची बालपणीची मैत्रीण श्लोका मेहता हिच्याशी लग्न केले, ज्यामुळे ते काही काळ चर्चेत होते. त्यांच्या लग्नाला रॉयल सेरेमनीचा दर्जा होता, पण त्यानंतर आकाश यांनी आपलं लक्ष हे जास्तीत जास्त व्यवसायावर केंद्रित केलं. रिलायन्स जिओने आकाश यांच्या नेतृत्वाखाली जगातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी बनण्याचा मान मिळवला. पण त्यांचे व्यक्तिमत्त्व तुलनेने शांत आणि व्यवसायाभिमुख आहे. त्यांचा भर नेहमीच रिलायन्स जिओच्या विस्तारावर आणि तंत्रज्ञानाच्या विकासावर राहिला आहे, ज्यामुळे ते माध्यमांच्या झोतात फारसे येत नाहीत.

हे वाचलं का?

    follow whatsapp