Sharad Mohol: ‘मुळशी पॅटर्न’ ज्यावरुन आला त्या ‘मोहोळ गँग’चा रक्तरंजित इतिहास! A टू Z स्टोरी…

मुंबई तक

Mohol Gang and Mulshi Pattern: मुळशी पॅटर्न ज्यावरुन आला त्या मोहोळ गँगचा पुण्यात नेमका उदय कसा झाला, काय आहे त्यांचा रक्तरंजित इतिहास जाणून द्या सविस्तरपणे…

ADVERTISEMENT

sharad mohol sandip mohol bloody history of the mohol gang in pune from which the movie mulshi pattern came
sharad mohol sandip mohol bloody history of the mohol gang in pune from which the movie mulshi pattern came
social share
google news

Mulshi Pattern: निलेश झालटे, पुणे: कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ ज्याच्या नावानं भल्याभल्यांचा थरकाप उडायचा. तो शुक्रवारी 5 जानेवारी 2024 रोजी कोथरूड परिसरातील सुतारदरा भागातून जात होता. त्यावेळी अचानक त्याच्या सुरक्षारक्षकांनी त्याच्यावर गोळ्या झाडून त्याची हत्या केली. गोळीबारानंतर शरद मोहोळला तातडीने कोथरूड परिसरातच असलेल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलेले. मात्र, उपचारादरम्यान शरद मोहोळनं शेवटचा श्वास घेतला. शरद मोहोळच्या मृत्यूनं पुण्यातलं हे टोळीयुद्ध संपलं की सुरु झालं हा खरंतरं मोठा सवाल आहे. मात्र ही रक्तरंजित ‘मुळशी पॅटर्नची’ स्टोरी सुरु होण्याचा इतिहास तितकाच भयंकर आणि अंगावर काटा आणणारा आहे. मुळशी पॅटर्न ज्यावरुन आला त्या मोहोळ गँगचा रक्तरंजित इतिहास काय आहे. या गॅंगवारची सुरुवात कशी झाली, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया सविस्तर… (sharad mohol sandip mohol bloody history of the mohol gang in pune from which the movie mulshi pattern came)

‘मुळशी पॅटर्न’ हा सिनेमा काही वर्षांपूर्वी चर्चेत होता. या सिनेमात पुण्यातल्या गुन्हेगारी टोळया, अर्थकारण त्याच्याशी संबंधित असलेले राजकारण या सगळ्या घटकांचे वास्तवदर्शी चित्रण करण्यात आले होते. मुळशी पॅटर्न हा सिनेमा नव्हता तर ते जळजळीत वास्तव होतं, एक स्टेटमेंट होतं. पण मुळशी पॅटर्न या सिनेमाचा जो नायक होता किंवा काही जणांसाठी जो खलनायक होता राहुल पाटील उर्फ राहुल्या याची भूमिका ज्या व्यक्तीवर बेतली होती त्याचीच गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

पुणे अन् टोळी युद्ध..

90 च्या दशकात पुणे शहर आणि आसपासचे तालुके हे कात टाकत होते. पुणे म्हणजे पेन्शनरचे शहर, पुणे म्हणजे सायकलींचे शहर ही ओळख जाऊन या शहराची नवी ओळख बनत होती. पुणे हे नवे आयटी हब बनत होते. आंतरराष्ट्रीय कंपन्या शहरात येत होत्या अर्थातच यासाठी मोठ्या प्रमाणात जमिनींचे व्यवहार होऊ लागले होते.

जमिनी या सोन्यापेक्षा महाग झाल्या होत्या. पुणे शहर जसं वाढत गेलं तसंतसे पुण्याच्या पंचक्रोशीत ज्यांच्या जमिनी होत्या ते अल्पावधीत कोट्याधीश झाले. पैसा आला तशी सत्ता आली, राजकारण आले, हितसंबंध आले, हितसंबंध जपण्यासाठी स्पर्धा सुरु झाली आणि याच स्पर्धेतून जन्म झाला तो पुण्यातल्या गँगवॉरचा, भाई लोकांचा आणि मुळशी पॅटर्नचा…

हे वाचलं का?

    follow whatsapp