शाहापूरमध्ये आश्रम शाळेतील 22 विद्यार्थिनींवर कर्मचाऱ्याकडून विनयभंग, आरोपीला अटक

मुंबई तक

Thane crime news : ठाणे जिल्ह्याच्या शाहापूर तालुक्यात एका आदिवासी आश्रम शाळेत गंभीर प्रकरण घडलंय. तेंभे गावातील एका शाळेत स्वयंपाक घरात मदतनीस म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीने 22 विद्यार्थिनींचा छळ केल्याचा आरोप आहे.

ADVERTISEMENT

Thane crime news
Thane crime news
Google CTA

बातम्या हायलाइट

point

शाळेतील मदतनीस विद्यार्थिनींना करायचा चुकीचा स्पर्श 

point

विद्यार्थिनींची अधीक्षकांकडे तक्रार दाखल

Thane Crime News : ठाणे जिल्ह्याच्या शाहापूर तालुक्यात एका आदिवासी आश्रम शाळेत गंभीर प्रकरण घडलंय. तेंभे गावातील एका शाळेत स्वयंपाक घरात मदतनीस म्हणून काम करणाऱ्या गणपत गवळी (वय 35) याच्यावर सहावी ते दहावीच्या सुमारे 22 विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. संबंधित आरोपीवर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हे ही वाचा : शिक्षकाकडून विद्यार्थिनीला शिक्षा, पीडितेनं शाळेतच संपवलं जीवन

शाळेतील मदतनीस विद्यार्थिनींना करायचा चुकीचा स्पर्श 

विद्यार्थिनींच्या जेवणानंतर ताट ठेवण्यासाठी स्वयंपाकघरात गेल्यावर गवळी त्यांना अयोग्यरित्या स्पर्श करायचा, असा आरोप आहे. सर्वात धक्कादायक बाब अशी की, यापूर्वी 2024 मध्ये दुसऱ्या एका आदिवासी आश्राम शाळेत शाळेत एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा आरोप गवळीवर केला. त्याला पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत अटक केली. एवढं करूनही, त्याची बदली करून दुसऱ्या ठिकाणी मुलींच्या आश्रामशाळेत पाठवले. 

24 ऑगस्ट रोजी एका विद्यार्थिनीने धाडस दाखवत करून शाळेच्या मुख्याध्यापिकेकडे जाऊन गवळीबद्दल तक्रार दाखल केली, तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. दरम्यान, एका विद्यार्थिनीच्या कृतीनंतर, शाळेतील एका विद्यार्थिनीच्या कृतीनंतर, शाळेतील इतर 21 विद्यार्थिनींनी पुढाकार घेत सर्व मुलींच्या सह्या असलेली एक लेखी तक्रार मुख्याध्यापिकेकडे सादर करण्यात आली होती. 

विद्यार्थिनींची अधीक्षकांकडे तक्रार दाखल

तक्रारीत म्हटलं की, गवळी जेवणानंतर ताट ठेवायला जाताना किंवा जवळून जाताना विद्यार्थिनींवर वारंवार स्पर्श करायचा. सर्वात लज्जास्पद बाब अशी की, जेव्हा मुलींनी शाळेच्या अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली, तेव्हा त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी ते संतापले आणि त्यांनी यापूर्वी काही विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याचे कबुल केले होते.