Crime: करायची होती हत्या पण संपवलं अख्ख कुटुंब... देशाला हादरवून सोडणारी घटना, घडलं काय?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'त्या' रात्री नेमकं काय घडलं?

point

एकामागून एकाचा घेतला जीव

point

हत्या की आत्महत्या? कसं फुटलं बिंग?

Sitapur Murder Case of 6 people : त्याला फक्त एकच हत्या करायची होती. मात्र हत्या करताना त्याच्या आईने पाहिलं. यामुळे त्याने तिलाही संपवण्याचा निर्णय घेतला. आता दोघांचा जीव तर घेतलाच आहे इतरांनाही संपवून टाकूयात असा विचार त्याच्या मनात आला आणि यानंतर नराधमाने त्या घरातील तब्बल 6 जणांची एकामागून एक निर्घृण हत्या केली. याच हत्याकांडावेळी त्याने एक गोळी झाडली जी दोन जणांना लागली आणि या एका गोळीनेच संपूर्ण प्रकरणाचं बिंग फुटलं. उत्तरप्रदेशमधील सीतापूर येथे घडलेल्या या हत्याकांडाने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं आहे. त्या रात्री नेमकं काय घडलं होतं? हे आपण सविस्तर जाणून घेऊयात. (uttar pradesh sitapur family murder case of 6 people the truth was revealed from the postmortem report)

'त्या' रात्री नेमकं काय घडलं?

पाल्हापूर हे उत्तर प्रदेशमधील सीतापूर येथील एक छोटंसं गाव आहे. जिथे 11 आणि 12 मे च्या मध्यरात्री हत्येचा रक्तरंजीत खेळ रंगला. एकाच कुटुंबातील सहा जणांची निर्घृण हत्या करण्यात आली. मृतांमध्ये घरातील प्रमुख, त्याची पत्नी, आई आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे.

एकामागून एकाचा घेतला जीव

हत्या करणाऱ्या नराधमाला सुरुवातीला एकच खून करायचा होता, असं पोलीस तपासात उघड झालं. मात्र त्याक्षणी मृत व्यक्तीच्या आईने पाहिलं त्यामुळे नराधमाने तिचाही जीव घेतला. दोघांच्या हत्येनंतर तिसऱ्याला का सोडायचं? असं जेव्हा नराधमाला वाटलं तेव्हा त्याने त्याच्या पत्नीलाही ठार केलं. घरात आजूबाजूला जेव्हा आवाज त्यावेळी झोपलेली 12 वर्षीय चिमुरडी जागी झाली. आई, आजी आणि वडिलांना मरताना तिने स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलं. मारेकऱ्याचा चेहराही ओळखीचा होता. मग काय? पुरावा नष्ट करण्यासाठी नराधमाने या मुलीवरही गोळी झाडली आणि तिचा जीव घेतला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा:  'मोदी देशाचे प्रमुख आहेत पण...', पवारांनी वर्मावरच ठेवलं बोट

यानंतर त्याच्या मनात आलं की, आता एका मुलीची हत्या केली आहे, तर दुसऱ्या दोन मुलांना तरी का ठेवायचं? यानंतर त्याने उरलेल्या दोन मुलांच्या डोक्यावर हातोड्याने वार केले आणि शेवटी त्यांच्या हत्येनंतर तीनही मुलांना एक एक करून छतावरून फेकून दिलं. मात्र यासोबतच हत्येशी संबंधित एक मोठा पुरावा मिळाला.

एका गोळीत, दोन ठार... नेमकं घडलं काय?

तुम्हाला विश्वास बसणार नाही पण, या प्रकरणाचा खुलासा एका गोळीमुळे झाला आहे. ही गोळी नरधमाने त्याच्या टार्गेटवर झाडली होती मात्र ती दुसऱ्याच्या शरीरातून मिळाली. अशाप्रकारे एका गोळीमुळे सहा जणांच्या हत्येचे धागेदोरे समोर आले. 

ADVERTISEMENT

हत्या की आत्महत्या? कसं फुटलं बिंग?

सुरूवातीला 'मास मर्डर कम सुसाइड' म्हणजेच सामूहिक हत्येनंतर, आत्महत्या असं या प्रकरणात घडलं असल्याचा संशय होता. कारण, 6 जणांच्या मृत्यूनंतर कुटुंबात एकाच व्यक्तीचा जीव वाचला होता, तो म्हणजे अजित सिंह... त्याने मृत भाऊ अनुराग सिंहवर पत्नी, मुले आणि आईची हत्या करण्याचा आणि नंतर स्वत:वर गोळी झाडल्याचा आरोप केला होता, ज्याचा पोलीस तपास करत होते.

ADVERTISEMENT

हेही वाचा: North Mumbai Lok Sabha : भाजपसाठी 'हा' फॅक्टर ठरणार डोकेदुखी?

पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून झाला खुलासा

या घटनेत मृत्यू झालेल्या अनुराग सिंहचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला तेव्हा त्याच्या डोक्यात एक नाही तर दोन गोळ्या लागल्याचे दिसून आले. कुटुंबियांची हत्या करून आत्महत्या केल्याचा आरोप असलेला अनुराग स्वतःच कुणाला तरी बळी ठरला होता हे यातून दिसू लागलं. कारण डोक्यात दोनदा गोळी मारणं ही आत्महत्या असू शकत नाही. कोणतीही व्यक्ती आपल्या डोक्यात एकामागून एक अशा दोन गोळ्या झाडू शकत नाही. पण आता प्रश्न असा पडतो की ज्या व्यक्तीने घरात घुसून सहा जणांची हत्या केली त्याला अनुरागचा मृत्यू आत्महत्या म्हणून दाखवायचा होता, तर मग त्याच्या डोक्यात दोनदा गोळ्या का झाडल्या?

हेही वाचा: Sharad Pawar : "लाचारी करावी, पण...", पवारांनी पटेलांचे टोचले कान

सख्खा भाऊच निघाला वैरी

दुसऱ्या गोळीमुळेच हत्येचं बिंग फुटलं आणि सख्खा भाऊच वैरी निघाला. पोलिसांनी हत्या करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अजितला जिथे आपल्या मृत भावाला या संपूर्ण हत्याकांडाचं दोषी ठरवायचं होतं, तिथे काही भलतंच घडलं. आरोपी अजितने जेव्हा अनुरागच्या 12 वर्षांच्या मुलीला मारण्यासाठी गोळी झाडली ती तिच्या गळ्यावर लागल्यानंतर आर-पार झाली. तीच गोळी अजितचा मृत भाऊ अनुराग याच्या डोक्यात लागली. या दुसऱ्या गोळीने हे गुपित उलगडले की, पाच खूनांनंतरची ही आत्महत्या नसून सहाही जणांची हत्याच करण्यात आली होती. पण यामागचं नेमकं कारण काय हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT