Lok Sabha Election 2024: 'आता त्यांनाच बाजूला घेऊन..', अजितदादा- अशोक चव्हाणांवरुन खरगेंचा PM मोदींना टोमणा
Mallikarjun Kharge Exclusive Interview: भाजप आधी भ्रष्टाचाराचे आरोप करतं आणि त्याच लोकांन सोबत घेऊन सत्ता उपभोगतं असा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत केला आहे.
ADVERTISEMENT

Mallikarjun Kharge on Ajit Pawar and Ashok Chavan BJP: नवी दिल्ली: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजप पुन्हा सत्तेत आलं तर संविधान बदलेल असा आरोप केला. याशिवाय भाजपने संस्थांचा गैरवापर करत महाराष्ट्रात ज्यांना भ्रष्टाचारी म्हणून संबोधलं आज त्यांनाच सत्तेत सोबत घेतलं. असं म्हणत खरगेंनी नाव न घेता अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्यावरून भाजपला टोमणा मारला. (exclusive interview mallikarjun kharge criticizes bjp over corruption issue also taunts ajit pawar and ashok chavan lok sabha election 2024)
'भ्रष्टाचारविरोधातील लढाई वेगवान करू नका असं त्यांना कोणी सांगितलंय? भ्रष्टाचाराविरोधात तुम्ही कारवाई करा पण त्यांनाच बाजूला घेऊन बसू नका.. आजवर तुम्ही जेवढ्या काही लोकांना भ्रष्टाचाराच्या नावाने घाबरुन तुमच्याकडे घेतलंय.. त्यांना पक्षात घेऊन तुम्ही राज्यसभा सदस्य बनवता.. मंत्री बनवता?' असं म्हणत खरगेंनी अशोक चव्हाण यांनी केलेल्या भाजप प्रवेशावर अप्रत्यक्षपणे टीका केली.
हे ही वाचा>> पूनम महाजनांचं तिकीट कापलं.. उज्ज्वल निकमांना उमेदवारी!
तर ते पुढे असंही म्हणाले की, 'अनेक ठिकाणी तर मुख्यमंत्री पदासाठी देखील लोकं त्यांनी घेतली पण नंतर त्यांना उपमुख्यमंत्री बनवलं.' असा टोला त्यांनी अजित पवारांनाही यावेळी लगावला.
इंडिया टुडे ग्रुपच्या Tak क्लस्टरचे व्यवस्थापकीय संपादक मिलिंद खांडेकर यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांची सविस्तर मुलाखत घेतली. न्यूज Tak च्या विशेष मुलाखतीत खरगे यांनी संविधान बदल केला जाईल असा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहे त्यावर त्यांची भूमिका स्पष्ट केली. याचवेळी त्यांनी महाराष्ट्रातील भाजपच्या राजकारणावरही भाष्य केलं.










