Maharashtra Lok Sabha : ठाकरे, पवारांबद्दल सहानुभूतीची लाट दिसतेय का? मोदी म्हणाले...

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे.
पंतप्रधान मोदींची शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका.
social share
google news

PM Modi on Sharad Pawar and Uddhav Thackeray : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन गटात विभागली गेली असून, लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शरद पवार आणि उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूतीची लाट असल्याचा मुद्दा चर्चेत आहे. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारण्यात आला. याला उत्तर देताना मोदींनी काका-पुतण्याचा उल्लेख करत पवारांवर निशाणा साधला. (What was PM Modi's answer to the question of whether there is a wave of sympathy for Sharad Pawar and Uddhav Thackeray in Maharashtra?)

न्यूज 18 वृत्तवाहिनीला पंतप्रधान मोदी यांनी मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवारांबद्दल सहानुभूतीची लाट दिसतेय का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्याला मोदींनी काय उत्तर दिले वाचा...

या प्रश्नाला उत्तर देताना मोदी म्हणाले, "ही गोष्ट खरी आहे की तिथे (महाराष्ट्र) आघाडीची सरकारे चालतात. विलासराव देशमुखांपासून आतापर्यंत... शरद पवारही जेव्हा मुख्यमंत्री बनले होते, तेही पुर्ण बहुमतासह बनू शकले नव्हते."

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> वर्षा गायकवाड यांना अर्ज भरण्याआधी अश्रू अनावर

"दुसरं महाराष्ट्राचं दुर्भाग्य राहिलेलं आहे की, खूप काळापासून पाच वर्षांपर्यंत कुणीही एकजण मुख्यमंत्री राहिलेला नाही. एकही व्यक्ती पाच वर्ष राहिला नाही. मोठ्या काळानंतर देवेंद्र फडणवीस हे पहिले व्यक्ती होते, जे पूर्ण कार्यकाळ मुख्यमंत्री राहिले. पूर्ण सरकार निष्कलंक राहिले. लोकांचं कल्याण करणारे सरकार राहिले."

सहानुभूतीच्या मुद्द्यावर मोदी काय म्हणाले?

"आता सहानुभूती तर आमच्यासोबत असायला पाहिजे. जे लोक आमच्यासोबत निवडणूक लढले, ज्या लोकांनी आमच्यासोबत निवडणूक लढवून महाराष्ट्रातील लोकांकडे मते मागितली. पण, मुख्यमंत्री बनण्याच्या स्वतःच्या महत्त्वाकांक्षेच्या कारणामुळे आणि त्यात अहंकार भरला. त्यामुळे तुम्ही (उद्धव ठाकरे) बाळासाहेब ठाकरेंच्या काळात बनवलेल्या जोडीला धोका दिला. त्याबद्दल लोकांना राग आहे. भाजपप्रती सहानुभूती आहे."

ADVERTISEMENT

हेही वाचा >> ठाकरेंकडून आलेल्या नेत्याला शिंदेंनी दिले तिकीट, 'या' मतदारसंघातून लढणार

"आता दुसरं. शिवसेनेत किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे वादळ निर्माण झालं, ते स्पष्टपणे दिसत आहे. जेव्हा तुम्ही कुटुंबातील लोकांनाच प्राधान्य देता आणि बाकीच्यांना देत नाही. त्यामुळे कधी ना कधी कठीण परिस्थिती निर्माण होते." 

ADVERTISEMENT

पवारांच्या घरात कौटुंबिक कलह -नरेंद्र मोदी

"शरद पवारांच्या घरात जो अवघड स्थिती आहे, तो त्यांचा कौटुंबिक कलह आहे. पुतण्या सांभाळणार की, मुलगी? इकडेही यांचं (ठाकरे) भांडण हेच आहे की, इतर कुठला नेता समोर येऊ द्यायचा की, मुलगा... जसा वाद काँग्रेसमध्ये सुरू आहे. ते भांडण त्यांचं आहे."

हेही वाचा >> "गुजरातची नवी आत्मा महाराष्ट्रात भटकतेय, कारण...", मोदींवर राऊतांचा पलटवार

"मी असं मानतो की, आपला देश या प्रकाऱ्या कौटुंबिक वादांचा तिरस्कार करतो. सहानुभूती नसते. त्यामुळे सहानुभूती शब्द घेऊन कुणी सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न कुणी करत असेल, तर मी असं मानतो की तेही अपयशी ठरणार आहे. लोक याचा तिरस्कार करतात.

"भाजपने महाराष्ट्राच्या भल्यासाठी त्याग केला"

"लोक अशा गोष्टी स्वीकारू शकत नाही. हे तुमच्या घरातील भांडणं आहेत, घरातच मिटवा ना? महाराष्ट्राला का बरबाद करत आहात? आज शिंदेंच्या नेतृत्वाखाली जे सरकार काम करत आहे. भाजपने जास्त जागा असूनही त्याग केला. त्याग महाराष्ट्राच्या भल्यासाठी केला आहे."

"काही लोकांना वाटत होतं की आम्हाला मुख्यमंत्री बनायचं आहे. नाही, आम्ही मुख्यमंत्री बनू शकलो असतो. नाही बनलो. महाराष्ट्रातील जनतेला आम्ही सांगितलं आहे की आम्ही महाराष्ट्रासाठी जगतो. आमच्यासाठी जगत नाही. या निवडणुकीत ही सहानुभूती आमच्या बाजूने आहे की, इतका मोठा पक्ष, एक मुख्यमंत्री यशस्वी राहिले, ते आज उपमुख्यमंत्री आहेत", अशी भूमिका मोदींनी मांडली. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT