इंदिरा गांधींनी मंदिरात जाणं टाळलं अन् संजय गांधींचा विमान अपघात; त्यादिवशी नेमकं काय घडलं?
23 जून 1980 पिट्स एस2-ए नावाचे छोटे विमान. संजय गांधी हे विमान चालवत होते. पण विमान वळवत असताना ते कोसळले. या अपघातात संजय गांधींचा मृत्यू झाला. याच्या एक दिवस आधी म्हणजे 22 जूनला इंदिरा गांधी हिमाचल प्रदेशातील पालमपूर येथील चामुंडा देवी मंदिरात दर्शनासाठी जाणार होत्या. संजय गांधींसोबत जाण्याची योजना होती. पण इंदिरा-संजय गांधींची चामुंडा देवी यात्रा 20 जूनलाच रद्द झाली. हे ऐकून मंदिराच्या पुजाऱ्याने संतप्त प्रतिक्रिया दिली.
ADVERTISEMENT

Sanjay Gandhi Death : 23 जून 1980 पिट्स एस2-ए नावाचे छोटे विमान. संजय गांधी हे विमान चालवत होते. पण विमान वळवत असताना ते कोसळले. या अपघातात संजय गांधींचा मृत्यू झाला. याच्या एक दिवस आधी म्हणजे 22 जूनला इंदिरा गांधी हिमाचल प्रदेशातील पालमपूर येथील चामुंडा देवी मंदिरात दर्शनासाठी जाणार होत्या. संजय गांधींसोबत जाण्याची योजना होती. पण इंदिरा-संजय गांधींची चामुंडा देवी यात्रा 20 जूनलाच रद्द झाली. हे ऐकून मंदिराच्या पुजाऱ्याने संतप्त प्रतिक्रिया दिली. पुजारी म्हणाला की, ‘कोणताही शासक देवीचा अपमान करू शकत नाही. अन्यथा देवी त्यांना माफ करणार नाही.’ (What is the exact connection between Sanjay Gandhi’s plane crash and Indira Gandhi’s Chamuda Devi Darshan)
संजय गांधी यांचा मृत्यू, त्यापूर्वी चामुंडा देवी मंदिराची यात्रा रद्द, ही यात्रा कोणी रद्द केली? यानंतर इंदिराजी चामुंडा देवीच्या दर्शनासाठी कधी पोहोचल्या? याबाबत नीरजा चौधरी यांनी त्यांच्या ‘हाऊ प्राइम मिनिस्टर्स डिसायड’ या पुस्तकात सविस्तर लिहिलं आहे.
Mumbai train firing : बुरखाधारी महिलेला म्हणायला लावलं ‘जय माता दी’, CCTV त कैद
इंदिराजींना चामुंडा देवी दर्शनाचा सल्ला
जानेवारी 1980 मध्ये इंदिरा गांधी पुन्हा सत्तेवर आल्या. पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार, विजयानंतर इंदिराजींचे जवळचे मित्र अनिल बली यांनी त्यांना एक सल्ला दिला होता. बली म्हणाले की, ‘शपथ घेतल्यानंतर चामुंडा देवीच्या दर्शनाला जावे. 15 जून रोजी इंदिराजींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. शपथविधीनंतर इंदिरा गांधी राष्ट्रपती भवनातून थेट 12, विलिंग्डन क्रिसेंट येथे त्यांच्या निवासस्थानी पोहोचल्या. जिथे त्यांना कीर्तनात सहभागी व्हायचे होते.
कीर्तनावेळी अनिल बली यांनी पुन्हा एकदा इंदिराजींना चामुंडा देवीचे दर्शन घेण्याची आठवण करून दिली. ज्याला इंदिराजी म्हणाल्या, ‘मला चार ते पाच महिन्यांचा वेळ द्या.’ चार महिने उलटले. मे 1980 च्या पहिल्या आठवड्यात बली यांना आरके धवन यांचे पत्र आले. धवन हे इंदिराजींचे जवळचे सचिव आणि सहकारी होते. 22 जून 1980 रोजी इंदिराजींना चामुंडा देवी मंदिरात जायचे होते, असे या पत्रात म्हटले होते. 22 जून रोजी संध्याकाळी 4.45 वाजता इंदिरा तिथे पोहोचतील, असे धवन यांनी पत्रात लिहिले होते.










