Maharashtra Vidhan Sabha Elections : सट्टेबाजारात कुणाची चर्चा? महायुतीसाठी कोणत्या आकड्याला जास्त भाव?
वेगवेगळ्या एक्झिट पोलमध्ये सध्या महायुतीची चर्चा सुरू आहे, मात्र सट्टेबाजारात कुणाचा बोलबोला?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सट्टेबाजारात कुणाचा बोलबाला?

कोणत्या आकड्यांना सर्वात जास्त भाव?
Maharashtra Vidhan Sabha Election Result : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. काल 20 नोव्हेंबररोजी मतदान पार पडलं, त्यानंतर लगेचच एक्झिट पोलची चर्चा सुरू झाली. मात्र अजूनही एका गोष्टीची चर्चा होतेय, ती म्हणजे फलोदी सट्टा बाजार. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप-महायुतीचं सरकार स्थापन होणार असा फलोदी सट्टा बाजाराचा यंदाचा अंदाज आहे. तसंच झारखंडमध्ये एनडीए आघाडीचंच सरकार स्थापन होईल असा अंदाज आहे. तर राजस्थानमध्ये 7 पैकी 5 जागा भाजपच्या बाजूने जाण्याची शक्यता या सट्टा बाजारात वर्तवण्यात येतेय.
हे ही वाचा >> Rahul Gandhi : गौतम अदानी यांना अटक करा... 'या' प्रकरणावरुन राहुल गांधींचे गंभीर आरोप
काही बड्या सट्टेबाजांच्या मते, महाराष्ट्रात भाजप महायुतीला एकूण 143 ते 146 जागा मिळण्याची अपेक्षा आहे. दोन्ही आकड्यांचा भाव सध्या समान म्हणजेच एक रुपयाने सुरू आहे. तर महाराष्ट्रात एकट्या भाजपला 90 ते 93 जागा मिळू शकतात असा अंदाज आहे. महाराष्ट्रात महायुतीच्या सरकार स्थापनेचा भाव 40 पैशांपर्यंत आहे. तसंच सट्टेबाजांच्या मते झारखंडमध्ये एनडीए आघाडीला 44 ते 46 जागा मिळण्याची शक्यता आहे. झारखंडमध्ये एनडीए आघाडीचा भावही 40 पैशांवर चालू आहे.
पाहा सगळे Exit पोलचे आकडे
1. Electrol Edge Exit Poll:
महायुती - या सर्व्हेनुसार महायुतीला 118 जागा मिळू शकतात
भाजप - 78
शिवसेना (शिंदे गट) - 26
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - 14