नांदेड जिल्ह्यात दहा महिन्यात 119 शेतकऱ्यांची आत्महत्या; दिवाळीच्या तोंडावर बळीराजा संकटात

मुंबई तक

नांदेड जिल्ह्यात मागील दहा महिन्यात तब्बल ११९ शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एकीकडे महाराष्ट्रात सत्ता संघर्ष सुरू असताना बळीराजा मात्र आसमानी संकटात सापडला आहे. सातत्याने सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पिकं भुईसपाट झाली आहेत तर प्रशासनाच्या दिरंगाईमुळे अद्याप पंचनामे देखील झाले नाहीत. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या परिवारला शासनाकड़ून मदत मिळाली नाही, यामुळे आता दिवाळी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

नांदेड जिल्ह्यात मागील दहा महिन्यात तब्बल ११९ शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एकीकडे महाराष्ट्रात सत्ता संघर्ष सुरू असताना बळीराजा मात्र आसमानी संकटात सापडला आहे. सातत्याने सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पिकं भुईसपाट झाली आहेत तर प्रशासनाच्या दिरंगाईमुळे अद्याप पंचनामे देखील झाले नाहीत. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या परिवारला शासनाकड़ून मदत मिळाली नाही, यामुळे आता दिवाळी कशी साजरी करावी,असा प्रश्न बळीराजासमोर उभा ठाकलाय.

नांदेड जिल्ह्यात गेल्या 10 महिन्यात 119 तर चार महिन्यात 68 शेतकऱ्यांचा आत्महत्या

एकीकडे राज्य सरकारने शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र अशी घोषणा केलेली असताना आत्महत्या थांबत नसल्याचे चित्र आहे. मराठवाडयातील नांदेड जिल्हयात दहा महिन्यात 119 तर, या चार महिन्यात 68 शेतकऱ्यांनी नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून मृत्यूला कवटाळले आहे. नांदेड जिल्ह्यात यंदा जुनच्या सुरवातीपासूनच मोठ्याप्रमाणात अतिवृष्टी झाली. दुबार पेरणी करूनही पिके पाण्याखाली गेली. पिकांना जगवणे कठीण होऊन बसल्याने शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत.

अतिवृष्टीचा 6 लाख शेतकऱ्यांना फटका

हे वाचलं का?

    follow whatsapp