मुख्यमंत्री VS राज्यपाल : राज्यपालांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खरमरीत पत्र; भाषेवर घेतला आक्षेप

मुंबई तक

विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीवरून राज्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्री विरुद्ध राज्यपाल यांच्यात सुप्त संघर्ष बघायला मिळत आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीबद्दलचा प्रस्ताव मंत्रिमंडळाने राज्यापाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठवला होता. मात्र, राज्यपालांकडून मंजूरी देण्यात न आल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना पत्र पाठवलं होतं. मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या पत्राला राज्यपालांनी प्रत्युत्तर दिलं असून, पत्रातील भाषेवरून राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली आहे. हिवाळी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीवरून राज्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्री विरुद्ध राज्यपाल यांच्यात सुप्त संघर्ष बघायला मिळत आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीबद्दलचा प्रस्ताव मंत्रिमंडळाने राज्यापाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठवला होता. मात्र, राज्यपालांकडून मंजूरी देण्यात न आल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना पत्र पाठवलं होतं. मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या पत्राला राज्यपालांनी प्रत्युत्तर दिलं असून, पत्रातील भाषेवरून राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा विचार होता. त्यामुळे सरकारने अध्यक्षांच्या निवडणूक प्रक्रियेत बदल करून राज्यपालांकडे निवडणुकीचा प्रस्ताव पाठवला होता. मात्र, नियमात करण्यात आलेल्या बदलांवर बोट ठेवत राज्यपालांनी कायदेशिर सल्ला घेण्यास वेळ लागणार असल्याचं सरकारला कळवलं.

राज्यपालांनी पाठवलेल्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पत्रातूनच उत्तर दिलं. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पाठवलेल्या पत्राला राज्यपालांनी उत्तर दिलं असून, पत्रातील भाषेत धमकीवजा सूर असल्याचं म्हणत नाराजी व्यक्त केली आहे.

विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या आवाजी मतदानाला राज्यपालांचा विरोध, ठाकरे सरकारला धक्का