म्यानमारमधल्या सत्तांतराने भारताचं टेन्शन वाढलं!

मुंबई तक

म्यानमारमध्ये सैन्य दलानं बंडाचं निशाण फडकवत देशात १ वर्षासाठी आणीबाणी लागू केलीय. तसंच आंग सान सू की यांच्यासोबतच सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना अटक केलीय. निवडणुकीतल्या कथित अफरातफरी प्रकरणामुळे आपण आणीबाणी लावल्याचं सैन्य दलाचं म्हणणं आहे. पण शेजारी देशातल्या या सत्तांतरानं भारताचं टेन्शन वाढवलंय. चिल्ड्रन ऑफ गांधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंग सांग सू की यांच्याशी भारताचे चांगले […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

म्यानमारमध्ये सैन्य दलानं बंडाचं निशाण फडकवत देशात १ वर्षासाठी आणीबाणी लागू केलीय. तसंच आंग सान सू की यांच्यासोबतच सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना अटक केलीय. निवडणुकीतल्या कथित अफरातफरी प्रकरणामुळे आपण आणीबाणी लावल्याचं सैन्य दलाचं म्हणणं आहे. पण शेजारी देशातल्या या सत्तांतरानं भारताचं टेन्शन वाढवलंय.

चिल्ड्रन ऑफ गांधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंग सांग सू की यांच्याशी भारताचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे भारतानं म्यानमारमधल्या या सत्तांतराबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केलीय.

भारतानं आपल्या निवेदनात म्हटलंय, ‘आम्ही म्यानमारमधल्या घटनाक्रमाची दखल घेतलीय. भारत नेहमीच म्यानमारमधल्या लोकशाही पद्धतीनं होणाऱ्या सत्ता हस्तांतराच्या बाजूने राहिलाय. त्यामुळेच कायद्याचं राज्य आणि लोकशाही प्रक्रिया अबाधित राहिल्या पाहिजेत. सगळ्या घटनाक्रमावर आमची बारकाईनं नजर आहे.’

हे वाचलं का?

    follow whatsapp