Twitter कडून देशाच्या राजकारणात ढवळाढवळ, लोकशाहीवर हल्ला-राहुल गांधी

मुंबई तक

ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग साईटने राहुल गांधी यांचे ट्विटर हँडल, काँग्रेसचे अनेक नेते आणि कार्यकर्ते यांची ट्विटर खाती तात्पुरती बंद केल्याचा आरोप काँग्रेसने केला. मात्र नियमांचं उल्लंघन झाल्याने ही कारवाई कऱण्यात आल्याचं ट्विटर इंडियाने म्हटलं होतं. आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वतःचे, पक्षाचे आणि इतर नेत्यांचे ट्विटर अकाऊंट लॉक केल्याबद्दल ट्विटरवर निशाणा साधला आहे. ट्विटर […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग साईटने राहुल गांधी यांचे ट्विटर हँडल, काँग्रेसचे अनेक नेते आणि कार्यकर्ते यांची ट्विटर खाती तात्पुरती बंद केल्याचा आरोप काँग्रेसने केला. मात्र नियमांचं उल्लंघन झाल्याने ही कारवाई कऱण्यात आल्याचं ट्विटर इंडियाने म्हटलं होतं. आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वतःचे, पक्षाचे आणि इतर नेत्यांचे ट्विटर अकाऊंट लॉक केल्याबद्दल ट्विटरवर निशाणा साधला आहे. ट्विटर इंडिया मोदी सरकारच्या म्हणण्यानुसार वागत आहे असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. एक कंपनी म्हणून देशाचे राजकारण ठरवण्याचे काम ट्विटर इंडिया करते आहे असा आरोपही राहुल गांधी यांनी केला आहे.

काय म्हटलं आहे राहुल गांधी यांनी?

राहुल गांधी यांनी यासंदर्भात एक व्हीडिओ शेअर केला आहे. ‘एक कंपनी म्हणून देशाचे राजकारण ठरवण्याचं काम ट्विटर इंडिया करत आहे. हा देशाच्या लोकशाही यंत्रणेवर असलेला हल्ला आहे. हा हल्ला फक्त राहुल गांधी म्हणून माझ्यावर नाही. हा फक्त आवाज बंद करण्याचा प्रश्न नाही तर लाखो आणि कोट्यवधी लोकांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न आहे. हा लोकशाहीवर झालेला हल्ला आहे.’

राहुल गांधींचं ट्विटर लॉक करण्यामागे नेमकं काय कारण?

हे वाचलं का?

    follow whatsapp