गोव्यात काँग्रेसला हरवण्यासाठी ममता बॅनर्जींची भाजपला मदत – अधीर रंजन चौधरींचा आरोप

मुंबई तक

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपची दैदीप्यमान कामगिरी आणि काँग्रेसची निराशा हा पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. पंजाब, उत्तर प्रदेश आणि मणिपूर या तीन राज्यांमध्ये काँग्रेसची कामगिरी अतिशय निराशाजनक झाली. गोव्यातही काँग्रेस भाजपला कडवी टक्कर देईल असा अंदात होता. परंतू प्रत्यक्षात काँग्रेसला गोव्यात १२ जागांवर समाधान मानावं लागलं. तृणमुल काँग्रेसने गोव्यात एंट्री करत दोन जागा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपची दैदीप्यमान कामगिरी आणि काँग्रेसची निराशा हा पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. पंजाब, उत्तर प्रदेश आणि मणिपूर या तीन राज्यांमध्ये काँग्रेसची कामगिरी अतिशय निराशाजनक झाली. गोव्यातही काँग्रेस भाजपला कडवी टक्कर देईल असा अंदात होता. परंतू प्रत्यक्षात काँग्रेसला गोव्यात १२ जागांवर समाधान मानावं लागलं. तृणमुल काँग्रेसने गोव्यात एंट्री करत दोन जागा जिंकल्या.

यानंतर काँग्रेसने तृणमुलवर टीका करताना गोव्यात काँग्रेसला हरवण्यासाठी तृणमुलने भाजपला मदत केल्याचं म्हटलं आहे. पश्चिम बंगालमधील काँग्रेस नेते अधिर रंजन चौधरी यांनी हा आरोप केला आहे.

काँग्रेसवर विसंबून राहण्यात अर्थ नाही, भाजपविरुद्ध पक्षांनी एकत्र येण्याची गरज- ममता बॅनर्जी

“सध्याच्या घडीला देशभरात काँग्रेसचे ७०० आमदार आहेत. काँग्रेसने विरोधकांची २० टक्के मत जिंकली आहे. ममता बॅनर्जी या भाजपच्या दलाल बनून त्यांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणूनच सध्या त्या खूप काही बोलत आहेत”, पश्चिम बंगालमधील विद्यार्थी अनिश खानच्या संशयास्पद मृत्यूविरोधात आयोजित आंदोलानामध्ये चौधरी बोलत होते.

हे वाचलं का?

    follow whatsapp