राज ठाकरेंच्या भाषणाचा इफेक्ट? हनुमान चालीसा पुस्तकांच्या विक्रीत 30-40 टक्क्यांनी वाढ

मुंबई तक

– रोहित वाळके, अहमदनगर प्रतिनिधी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या गुढीपाडव्यातील भाषणात मशिदीवरील भोंगे आणि त्याला उत्तर म्हणून हनुमान चालीसेचा मुद्दा चांगलाच गाजतो आहे. या राजकीय परिस्थिीतीचा परिणाम आता भोंगे आणि हनुमान चालीसेच्या विक्रीवर होताना दिसत आहे. अहमदनगरमध्ये धार्मिक पुस्तकांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनी हनुमान चालीसेच्या पुस्तकांमध्ये 30 ते 40 टक्के वाढ झाल्याचं सांगितलं. राज ठाकरेंनी केलेल्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

– रोहित वाळके, अहमदनगर प्रतिनिधी

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या गुढीपाडव्यातील भाषणात मशिदीवरील भोंगे आणि त्याला उत्तर म्हणून हनुमान चालीसेचा मुद्दा चांगलाच गाजतो आहे. या राजकीय परिस्थिीतीचा परिणाम आता भोंगे आणि हनुमान चालीसेच्या विक्रीवर होताना दिसत आहे. अहमदनगरमध्ये धार्मिक पुस्तकांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनी हनुमान चालीसेच्या पुस्तकांमध्ये 30 ते 40 टक्के वाढ झाल्याचं सांगितलं.

राज ठाकरेंनी केलेल्या आवाहनानंतर हनुमान चालीसेच्या पुस्तकांची मागणी दुप्पटीने वाढल्याचं अहमदनगरमधील उदय एजन्सीचे मालक विवेक कुलकर्णी यांनी सांगितलं. हनुमान चालीसेच्या पॉकेट साईज पुस्तकांची प्रत्येक दिवशी 100 प्रति विकल्या जात होत्या. परंतू हनुमान चालीसेचा मुद्दा राज्यात तापल्यानंतर या संख्येत वाढ झाली आहे. महिन्याकाठी आता हनुमान चालीसेच्या 6 हजार प्रति विकल्या जात असल्याचं कुलकर्णी यांनी सांगितलं.

अहमदनगरमध्ये दरवर्षी होळी ते हनुमान जयंती या काळात हरिनाम सप्ताह, हनुमान चालीसा पठणाचे कार्यक्रम होतात. या कार्यक्रमांमध्ये पूर्वी चालीसेची पुस्तकं वाटली जायची. राज ठाकरेंनी केलेल्या आव्हानानंतर आता युवकही हनुमान चालीसेची पुस्तक विकत घेत असून अन्य धार्मिक कार्यक्रम ते वाढदिवसातही हनुमान चालीसा वाटली जात असल्याचं कुलकर्णी यांनी मुंबई तक शी बोलताना सांगितलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp