विधानसभेत वादळी चर्चा, एका क्लिकवर दिवसभराचा घटनाक्रम जसा घडला तसा

मुंबई तक

मुंबई: अर्थसंकल्पीय अधिवेशनातील आजचा दिवस अक्षरश: वादळी ठरला आहे. कारण विधानसभेत मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणावरुन विरोधकांनी सरकारवर अतिशय आक्रमक पद्धतीने टीका केली. दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी देखील डेलकर आणि अन्वय नाईक यांच्या आत्महत्येच्या प्रकरणावरुन भाजपला सातत्याने टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आजच्या दिवसाचं कामकाज प्रचंड गदारोळात पार पडलं. जाणून घ्या आज दिवसभरात विधानसभेत नेमकं काय-काय घडलं. (see […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: अर्थसंकल्पीय अधिवेशनातील आजचा दिवस अक्षरश: वादळी ठरला आहे. कारण विधानसभेत मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणावरुन विरोधकांनी सरकारवर अतिशय आक्रमक पद्धतीने टीका केली. दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी देखील डेलकर आणि अन्वय नाईक यांच्या आत्महत्येच्या प्रकरणावरुन भाजपला सातत्याने टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आजच्या दिवसाचं कामकाज प्रचंड गदारोळात पार पडलं. जाणून घ्या आज दिवसभरात विधानसभेत नेमकं काय-काय घडलं. (see what happened in the assembly all day 9 march 2021 long with one click)

आज विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात यावी अशी मागणी केली. ज्यानंतर दिवसभर विधानसभेत याच एका प्रकरणाभोवती सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली.

मनसुख हिरेन मृत्यू: सचिन वाझेंना तात्काळ अटक करा – देवेंद्र फडणवीस

मनसुख हिरेन हत्ये प्रकरणी आज विधानसभेत पुन्हा एकदा गदारोळ पहायला मिळाला. राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात सचिन वाझे यांच्या अटकेची मागणी केली आहे. हिरेन यांच्या पत्नीने लिहीलेल्या पत्रातला मजकूर वाचून दाखवत देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात पुन्हा एकदा सरकारवर हल्लाबोल चढवला.

हे वाचलं का?

    follow whatsapp