हे लोक मराठी माणसालाच परप्रांतीय ठरवतील; पाटलांच्या ‘त्या’ विधानांवरून राऊतांनी सुनावलं
साकीनाक्यात एका महिलेवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनं मुंबई हादरली. या प्रकरणातील आरोपी परप्रांतीय असल्याचं समोर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी परप्रांतीय लोकांच्या ठेवण्याच्या सूचना केल्या. त्यावर ‘परप्रांतीयांना का दोष देता? मराठी लोक गुन्हे करीत नाहीत काय?’ असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. पाटलांच्या याचं विधानावरून राऊतांनी भाजपला खडेबोल सुनावले आहेत. साकीनाका बलात्कार प्रकरण, उत्तर प्रदेश विधानसभा आणि मुंबई महापालिका […]
ADVERTISEMENT

साकीनाक्यात एका महिलेवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनं मुंबई हादरली. या प्रकरणातील आरोपी परप्रांतीय असल्याचं समोर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी परप्रांतीय लोकांच्या ठेवण्याच्या सूचना केल्या. त्यावर ‘परप्रांतीयांना का दोष देता? मराठी लोक गुन्हे करीत नाहीत काय?’ असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. पाटलांच्या याचं विधानावरून राऊतांनी भाजपला खडेबोल सुनावले आहेत.
साकीनाका बलात्कार प्रकरण, उत्तर प्रदेश विधानसभा आणि मुंबई महापालिका निवडणुकीकडे लक्ष वेधत संजय राऊत यांनी भाजप नेत्यांच्या भूमिकेवर ‘रोखठोक’मधून टीकेचे बाण डागले आहेत.
‘साकीनाक्यातील बलात्कार प्रकरणानंतर भाजपने परप्रांतीयांचा मुद्दा उकरून काढला. मुंबईत बाहेरून आलेल्यांवर लक्ष ठेवा, असं मुख्यमंत्री पोलिसांना सांगतात व त्याचे राजकीय भांडवल भाजपसारखे पक्ष करतात. हे राजकारण उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी व मुंबई महानगरपालिकेसाठी चालले आहे. एक दिवस हे लोक मराठी माणसालाच परप्रांतीय ठरवतील!’, असा घणाघाती आरोप संजय राऊत यांनी भाजपवर केला.
संजय राऊत म्हणतात… ‘रोखठोक’मधील १३ मुद्दे