भारत-पाक क्रिकेट संघाच्या फाळणीची कथा, जाणून घ्या गुल-इलाही-कारदारची आश्चर्यकारक कहाणी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

IND vs PAK : 1947 चा काळ जेव्हा भारत आणि पाकिस्तान वेगळे झाले. खेळाच्या दृष्टीनेही तो एक वेगळा टप्पा होता, कारण केवळ दोन देशच नाही तर खेळाडूही विभागले गेले होते. कोणता खेळाडू कोणत्या देशात राहणार आणि कुठे खेळणार? हे ठरवणे देखील अवघड होते.

कारण पाकिस्तानला भारतापासून वेगळे व्हावे लागले. याआधी पाकिस्तान अस्तित्वात नव्हता. अशा स्थितीत पाकिस्तानचा नवा संघ तयार होणे साहजिकच होते आणि भारत सोडून गेलेल्या खेळाडूंनाच पाकिस्तानचे क्रिकेट, हॉकी आणि इतर संघ बनवायचे होते. यात क्रिकेटची भूमिका काहीशी वेगळी होती.

त्यावेळी भारतात क्रिकेट फारसे लोकप्रिय नव्हते. ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक सुवर्ण जिंकणारा हॉकी संघ वर्चस्व गाजवत होता. आशियामध्ये क्रिकेटचा दबदबा 1983 नंतर आला, जेव्हा भारतीय संघाने कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकला. बरं, विषय फाळणीचा चालू आहे, तेव्हा भारतीय संघातून असे तीन खेळाडू खेळत होते, ज्यांनी कोणत्या देशात राहायचे हे ठरवायचे होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे खेळाडू होते फिरकी अष्टपैलू अब्दुल हाफीज कारदार, वेगवान गोलंदाज अष्टपैलू गुल मोहम्मदसह अमीर इलाही. इलाही मध्यमगती गोलंदाज आणि फिरकी गोलंदाज होता. या तिन्ही खेळाडूंच्या कथा अप्रतिम आहेत. यापैकी कारदार आणि इलाही यांनी पाकिस्तानला जाऊन एकाच संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला. तर गुलने भारतीय संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला. गुलने पाकिस्तान विरुद्धच्या पहिल्या मालिकेत त्याच्याविरुद्ध सामना खेळला होता. पण गुलचा भारताकडून खेळण्याचा निर्णय 1952 पर्यंतच सिमीत राहिला होता. यावर्षी भारत आणि पाकिस्तान यांच्यात कसोटी मालिका खेळली गेली. त्यानंतर गुलने पाकिस्तानकडून खेळण्याचा निर्णय घेतला.

पाकिस्तानने भारताविरुद्ध पहिली मालिका खेळली

वास्तविक, भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश 1947 मध्ये वेगळे झाले होते, परंतु पाकिस्तान क्रिकेट संघ पहिल्यांदा 1952 मध्ये अस्तित्वात आला. त्या वर्षाच्या अखेरीस म्हणजेच ऑक्टोबरमध्ये पाकिस्तान संघाने भारताचा दौरा केला. येथे भारतात दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका निश्चित करण्यात आली होती.

ADVERTISEMENT

पाकिस्तान संघाचे कर्णधारपद त्यानंतर अब्दुल कारदार यांच्याकडे सोपवण्यात आले. म्हणजेच पाकिस्तान संघाचा पहिला कर्णधार असा होता जो भारतीय संघासाठी क्रिकेट खेळला होता. या मालिकेत भारतीय संघाने 2-1 असा विजय मिळवला. पाकिस्तान संघ अस्तित्वात येताच पहिला सामना हरला होता, मात्र दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा एक डाव आणि ४३ धावांनी पराभव झाला होता. मालिकेतील शेवटच्या दोन कसोटी सामने अनिर्णित राहिल्या होत्या.

ADVERTISEMENT

मला भारतीय संघात संधी मिळाली नाही, तर पाकिस्तानला गेलो.

पाकिस्तानचा पहिला संघ पूर्णपणे नवीन होता. त्यात भारताकडून क्रिकेट खेळणारे दोनच खेळाडू होते. म्हणजेच या मालिकेत उर्वरित 12 खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण सामना होता. अब्दुल कारदारने यापूर्वी भारतीय संघासाठी 3 कसोटी सामने खेळले होते आणि इलाहीने केवळ एक कसोटी सामना खेळला होता. या दोन्ही खेळाडूंना भारतीय संघात फारशी संधी मिळत नव्हती, असे म्हणता येईल.

कर्णधार असताना, कारदारने पाकिस्तानसाठी 23 कसोटी सामने खेळले, तर इलाहीला केवळ 5 सामन्यांमध्ये संधी मिळाली. त्याच्यात उलट परिस्थिती गुल मोहम्मदची होती. त्याने भारतासाठी 8 सामने खेळले, तर पाकिस्तानसाठी तो एकच सामना खेळू शकला.

कोणत्या संघासाठी किती सामने खेळले

अब्दुल कारदार

भारतासाठी 3 कसोटी

पाकिस्तानसाठी 23 कसोटी

अमीर इलाही

भारतासाठी 1 कसोटी

पाकिस्तानसाठी 5 कसोटी

गुल मोहम्मद

भारतासाठी 8 कसोटी

पाकिस्तानसाठी 1 कसोटी

    follow whatsapp

    ADVERTISEMENT