महात्मा गांधींनी ठरवलं असतं तर ते भगत सिंग यांची फाशी रद्द करण्यात यशस्वी झाले असते?
फेसबुक आणि व्हॉट्स अॅपवर अनेकदा मेसेज फिरतो की जर महात्मा गांधी यांनी ठरवलं असतं तर ते भगत सिंग यांची फाशी वाचवू शकले असते. महात्मा गांधी यांनी जाणीवपूर्वक भगत सिंग यांना फाशी होऊ दिली अशीही चर्चा होते. आपण जाणून घेणार आहोत काय आहे वास्तव. 23 मार्च 1931 हाच तो दिवस होता, लाहोरमधलं सेंट्रल जेलमध्ये भगत सिंग, […]
ADVERTISEMENT

फेसबुक आणि व्हॉट्स अॅपवर अनेकदा मेसेज फिरतो की जर महात्मा गांधी यांनी ठरवलं असतं तर ते भगत सिंग यांची फाशी वाचवू शकले असते. महात्मा गांधी यांनी जाणीवपूर्वक भगत सिंग यांना फाशी होऊ दिली अशीही चर्चा होते. आपण जाणून घेणार आहोत काय आहे वास्तव.
23 मार्च 1931 हाच तो दिवस होता, लाहोरमधलं सेंट्रल जेलमध्ये भगत सिंग, राजगुरू, सुखदेव यांना फाशी देण्यात आली. या घटनेची जबाबदारी महात्मा गांधींवर टीका करणारे कायम त्यांच्यावरच ढकलत असतात.
महात्मा गांधी यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या..
भगतसिंग, राजगुरु, सुखदेव या तीन क्रांतीकारी तरूणांना सगळा देश ओळखू लागला होता. कोर्टात या तरूणांनी ट्रायलच्या दरम्यान जी वक्तव्यं केली होती त्यामुळे त्यांच्या प्रकरणाची खूप चर्चा झाली. महात्मा गांधी हे त्यावेळी भारतातले सर्वात मोठे नेते होते. त्यामुळे लोकांना महात्मा गांधी या प्रकरणात लक्ष घालतील अशी अपेक्षा होती.