फडणवीसांनी दिलेलं मराठा आरक्षण ‘फुलप्रुफ’ असतं तर राज्यपालांना भेटायची वेळ आली नसती-उद्धव ठाकरे

मुंबई तक

देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना केलेला मराठा आरक्षणाचा कायदा हा फुलप्रुफ असता तर आम्हाला राज्यपालांना भेटण्याची वेळ आली नसती. असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी हा टोला लगावला आहे. राजकीय नेत्यांच्या आरोप-प्रत्योरापांमध्ये मराठा समाजाचं अतोनात नुकसान -मराठा क्रांती मोर्चा गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना केलेला मराठा आरक्षणाचा कायदा हा फुलप्रुफ असता तर आम्हाला राज्यपालांना भेटण्याची वेळ आली नसती. असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी हा टोला लगावला आहे.

राजकीय नेत्यांच्या आरोप-प्रत्योरापांमध्ये मराठा समाजाचं अतोनात नुकसान -मराठा क्रांती मोर्चा

गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला त्यानंतर आज आम्ही त्याच संदर्भात राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची भेट घेतली. जो निकाल सुप्रीम कोर्टाने दिला त्यानुसार हे स्पष्ट झालं आहे की केंद्र सरकारला आता मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्याची मुभा आहे. त्यामुळे त्याच अनुषंगाने आम्ही राज्यपालांची भेट घेतली आणि महाराष्ट्राचं म्हणणं केंद्रापर्यंत पोहचवा अशी विनंती आम्ही राज्यपालांना केली. राज्यपालांनी आमची विनंती मान्य केली आहे. लवकरच आम्ही पंतप्रधानांची भेट घेणार आहोत. पंतप्रधानांनाही यासंदर्भातली विनंती करणार आहोत.

आतापर्यंत 13 मुख्यमंत्री, अनेक क्षेत्रात मराठा समाजाचे वर्चस्व तरीही आरक्षणाची मागणी? पाहा सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं

हे वाचलं का?

    follow whatsapp