मोठी बातमी! राज्यातील महाविद्यालयं 15 फेब्रुवारीपासून सुरु होणार

मुंबई तक

महाराष्ट्रातील महाविद्यालयं 15 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहेत अशी घोषणा आज उच्च तंत्र शिक्षण उदय सामंत यांनी केली आहे. ऑफलाईन आणि ऑनलाईन असे दोन्ही पर्याय असणार आहेत. 50 टक्के उपस्थितीसह ही महाविद्यालयं सुरु कऱण्यात येणार आहेत. यावर्षी 75 टक्के उपस्थितीचं बंधन विद्यार्थ्यांना नाही असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. महाविद्यालयं सुरु करताना कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळले जाणं […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

महाराष्ट्रातील महाविद्यालयं 15 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहेत अशी घोषणा आज उच्च तंत्र शिक्षण उदय सामंत यांनी केली आहे. ऑफलाईन आणि ऑनलाईन असे दोन्ही पर्याय असणार आहेत. 50 टक्के उपस्थितीसह ही महाविद्यालयं सुरु कऱण्यात येणार आहेत. यावर्षी 75 टक्के उपस्थितीचं बंधन विद्यार्थ्यांना नाही असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. महाविद्यालयं सुरु करताना कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळले जाणं बंधनकारक असणार आहे असंही सामंत यांनी स्पष्ट केलं.

कोरोना अद्याप संपलेला नाही, मात्र मोठ्या प्रमाणावर आटोक्यात आला आहे. तसंच लसीकरणही सुरु कऱण्यात आलं आहे. जून महिन्यापर्यंत आणखी एक लस येण्याचीही शक्यता आहे. अनलॉकच्या पार्श्वभूमीवर आता हळूहळू सगळं चक्र पूर्वपदावर आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु झाले आहेत हेच या निर्णयांमधून दिसतं आहे.

हे वाचलं का?