गोवा ते आसाम व्हाया महाराष्ट्र! भाजपच्या मित्रपक्षांची गेल्या आठ वर्षात काय झाली अवस्था?
राज्यात नवं सरकार स्थापन होण्याच्या आधी आठवडाभर काय घडलं हे नव्याने सांगण्याची गरज नाही. या बंडाळीनंतर शिवसेनेचं काय होणार? शिवसेना संपणार की आणखी बळकट होणार? भाजपसोबत जुळवून घेणार का? असे आणि यासारखे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. याच प्रश्नाचं बोटं धरून एक प्रश्न डोकं वर काढतोय आणि तो म्हणजे भाजपसोबत राहिलेल्या मित्रपक्षांची गेल्या 8 वर्षात […]
ADVERTISEMENT

राज्यात नवं सरकार स्थापन होण्याच्या आधी आठवडाभर काय घडलं हे नव्याने सांगण्याची गरज नाही. या बंडाळीनंतर शिवसेनेचं काय होणार? शिवसेना संपणार की आणखी बळकट होणार? भाजपसोबत जुळवून घेणार का? असे आणि यासारखे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. याच प्रश्नाचं बोटं धरून एक प्रश्न डोकं वर काढतोय आणि तो म्हणजे भाजपसोबत राहिलेल्या मित्रपक्षांची गेल्या 8 वर्षात काय अवस्था झाली असा…
गोव्यातील महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीपासून ते आसामातील आसाम गण परिषदेपर्यंत! मग यात बिहार, पंजाबातील प्रादेशिक पक्षापासून ते महाराष्ट्रातील शिवसेनेपर्यंत सगळेच आले. भाजपसोबत राहिलेल्या या मित्रपक्षांची आणि त्या त्या राज्यात भाजपची काय स्थिती आहे, बघुयात…
वैचारिक भूमिका एकसारखी असणाऱ्या शिवसेना आणि भाजपची युती झाली ती 1889 मध्ये, त्यानंतर भाजप-सेना दोनवेळा महाराष्ट्रात सत्तेत राहिले. 1995 मध्ये पहिल्यांदा युतीचं सरकार राज्यात आलं. त्यानंतर 2014 ते 2019 या काळात राज्यात युतीचं सरकार आलं. पहिल्या सरकारमध्ये शिवसेनेचे मनोहर जोशी आणि नारायण राणे हे मुख्यमंत्री राहिले, २०१४ मध्ये पण यावेळी भाजपचा मुख्यमंत्री राहिला.
1999 ते 2019 या काळात महाराष्ट्रात विधानसभेच्या सात निवडणुका झाल्या. सातपैकी एक निवडणूक (2014) सोडली, तर सगळ्या निवडणुका शिवसेना-भाजप एकत्र लढले. 2019ची विधानसभा निवडणूक दोन्ही पक्षांनी एकत्र लढवली मात्र सत्ता वाटपावरून बिनसले आणि शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केलं. अडीच पावणे तीन वर्षांनंतर शिवसेनेचे तब्बल 40 आमदार फुटले आणि सरकार कोसळलं. शिवसेनेतील फुटीमागे भाजपचा संबंध नसल्याचं पक्षातील नेत्यांकडून वेळोवेळी स्पष्ट केलं गेली, पण भाजपच्या मदतीशिवाय शिवसेनेत इतकी मोठी फूट पडू शकत नाही, असं राजकीय विश्लेषकांची मतं आहेत.