एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात काय बदल झाले?

मुंबई तक

२१ जून २०२२ हा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा दिवस ठरला आहे. याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे एकनाथ शिंदे यांनी पुकारलेलं बंड. पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधातच एकनाथ शिंदे यांनी दंड थोपटले आहेत. भाजपने विधान परिषदेच्या पाच जागा जिंकल्या आणि त्याच रात्री एकनाथ शिंदेंसह ४० आमदार सुरतला पोहचल्याची बातमी समोर आली. शिवसेनेला मोठा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

२१ जून २०२२ हा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा दिवस ठरला आहे. याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे एकनाथ शिंदे यांनी पुकारलेलं बंड. पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधातच एकनाथ शिंदे यांनी दंड थोपटले आहेत. भाजपने विधान परिषदेच्या पाच जागा जिंकल्या आणि त्याच रात्री एकनाथ शिंदेंसह ४० आमदार सुरतला पोहचल्याची बातमी समोर आली.

शिवसेनेला मोठा हादरा देणारी ही बातमी ठरली आहे. सुरूवातीला १० ते १२ आमदार त्यांच्यासोबत आहेत या चर्चा रंगल्या होत्या. मात्र आता माझ्यासोबत ४० आमदार आहेत, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. शिवसेनेत झालेलं हे बंड अभूतपूर्व असंच आहे. कारण शिवसेना सत्तेत असताना आणि विशेष म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना!

महाविकास आघाडीची सत्ता टिकणार का? काय आहेत शक्यता?

हे वाचलं का?