राज्यसभा निवडणुकीत प्रचंड मोठा ‘Twist’, भाजपच्या ‘त्या’ पत्रामुळे मतमोजणीच थांबली!
मुंबई: राज्यसभा निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी भाजपकडून आता सर्व आयुधांचा वापर होत असल्याचं दिसतं आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचं पारडं जड दिसत असल्याने भाजपने एक वेगळी रणनिती आखली आहे. ज्यामुळे या संपूर्ण निवडणुकीत एक वेगळाच ट्विस्ट निर्माण झाला आहे. ज्यामध्ये त्यांनी महाविकास आघाडीच्या तीन आमदारांची मतं बाद करण्याची मागणी केली आहे. याबाबत भाजपने थेट केंद्रीय निवडणूक […]
ADVERTISEMENT

मुंबई: राज्यसभा निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी भाजपकडून आता सर्व आयुधांचा वापर होत असल्याचं दिसतं आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचं पारडं जड दिसत असल्याने भाजपने एक वेगळी रणनिती आखली आहे. ज्यामुळे या संपूर्ण निवडणुकीत एक वेगळाच ट्विस्ट निर्माण झाला आहे. ज्यामध्ये त्यांनी महाविकास आघाडीच्या तीन आमदारांची मतं बाद करण्याची मागणी केली आहे. याबाबत भाजपने थेट केंद्रीय निवडणूक आयोगाला तक्रारीचं एक पत्रच दिलं आहे. ज्यामुळे महाराष्ट्र विधानसभेतील मतमोजणी थांबविण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपने असा दावा केला आहे की, मतदानादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड, काँग्रेसच्या यशोमती ठाकूर आणि शिवसेनेचे सुहास कांदे यांनी मतदानाची प्रक्रिया पाळली नाही. त्यांनी त्याचं उल्लंघन केलं आहे. त्यामुळे ही तीन मतं बाद व्हावीत अशा आशयाचं पत्र भाजपने मुख्य निवडणूक आयुक्तांना दिलं आहे.
भाजपने महाराष्ट्रातील मतमोजणी संदर्भात निवडणूक आयोगाकडे जाऊन आपली तक्रार नोंदवली आहे. ज्या पद्धतीने काँग्रेसने 2017 मध्ये निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती त्याच पद्धतीने आता भाजपने दिल्लीत निवडणूक आयोगासमोर आपली तक्रार नोंदवली आहे.