Unlock : लग्नाला 100 माणसं बोलवायची की 200 ?; लग्न सोहळ्याच्या निर्बंधाबद्दल टोपे काय म्हणाले?

मुंबई तक

14 एप्रिलपासून राज्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधातून राज्य सरकारने नागरिकांची काहीअंशी मुक्तता केली आहे. आज (11 ऑगस्ट) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राजेश टोपे यांनी राज्यातील निर्बंध काही हटवण्यात येत असल्याची माहिती दिली. लग्न सोहळ्यासंदर्भातील निर्बंधही राज्य सरकारने काही प्रमाणात हटवले असून, त्याबद्दलच्या नियमांचीही टोपे यांनी माहिती दिली. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी 15 ऑगस्टपासून […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

14 एप्रिलपासून राज्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधातून राज्य सरकारने नागरिकांची काहीअंशी मुक्तता केली आहे. आज (11 ऑगस्ट) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राजेश टोपे यांनी राज्यातील निर्बंध काही हटवण्यात येत असल्याची माहिती दिली. लग्न सोहळ्यासंदर्भातील निर्बंधही राज्य सरकारने काही प्रमाणात हटवले असून, त्याबद्दलच्या नियमांचीही टोपे यांनी माहिती दिली.

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी 15 ऑगस्टपासून राज्यातील निर्बंध काही प्रमाणात हटवण्यात येत असल्याचं सांगितलं. यावेळी टोपे यांनी लग्न सोहळ्यांबद्दलच्या नियमांचीही माहिती दिली. कोणत्या लग्न सोहळ्याला 100 किंवा 200 माणसं बोलावता येणार याबद्दलही त्यांनी माहिती दिली.

राजेश टोपे म्हणाले, ‘लग्न सोहळ्यांवर घालण्यात आलेले निर्बंधही शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जे लग्न सोहळे मंगल कार्यालयात होतील, तिथे फक्त १०० माणसांना वा मंगल कार्यालचा परवानगी असणार आहे. तर मोकळ्या जागेत होणाऱ्या लग्न सोहळ्याला 200 माणसांना बोलावण्याची परवानगी देण्यात आली आहे.

मंदिरात जाऊन देव दर्शन नाहीच!

हे वाचलं का?

    follow whatsapp