टेन्शन वाढलं! महाराष्ट्रातली ‘ही’ शहरं ठरत आहेत कोरोनाचे हॉटस्पॉट
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढणाऱ्या रूग्णसंख्येने महाराष्ट्राचं टेन्शन वाढवलं आहे. अमरावतीमध्ये १ मार्चपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. येत्या आठ दिवसात काय काय गोष्टी घडतात? रुग्ण वाढतात का? कोरोनाचा प्रादुर्भाव होतो आहे का? या सगळ्या गोष्टींवर महाराष्ट्रातील आरोग्य विभागाची नजर आहे. पुढचे आठ दिवस महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. इंडिया टुडेने वाढत्या […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढणाऱ्या रूग्णसंख्येने महाराष्ट्राचं टेन्शन वाढवलं आहे. अमरावतीमध्ये १ मार्चपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. येत्या आठ दिवसात काय काय गोष्टी घडतात? रुग्ण वाढतात का? कोरोनाचा प्रादुर्भाव होतो आहे का? या सगळ्या गोष्टींवर महाराष्ट्रातील आरोग्य विभागाची नजर आहे. पुढचे आठ दिवस महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. इंडिया टुडेने वाढत्या कोरोना रुग्णांच्या संदर्भात महाराष्ट्राचा जो आढावा घेतला आहे, त्यामध्ये असं लक्षात आलं आहे की अमरावती आणि नागपूरमध्ये हे प्रमाण अधिक आहे. अमरावतीत ५४६ केसेस आढळल्या तेव्हा नागपुरात ५२२ केसेस आढळल्या. मुंबईतल्या ४३३ या कोरोना केसेसच्या संख्येलाही मागे टाकणाऱ्या या संख्या ठरल्या आहेत.
अमरावती आणि नागपूर हे महाराष्ट्राच्या ईशान्य देशाला येतात. तर जालना हे मध्यावर येतं. उस्मानाबाद, सांगली, कोल्हापूर आणि नंदुरबार हे जिल्हे दक्षिणेकडे येतात. मात्र या चार जिल्ह्यांमध्ये कोरोना रूग्णांचं प्रमाण कमी झालं आहे. २२ फेब्रुवारीला महाराष्ट्रात ५ हजार २१० अॅक्टिव्ह रूग्ण होते. तर संपूर्ण देशात त्या दिवशी १ लाख ४७ हजार ३०६ अॅक्टिव्ह रूग्ण होते.
या पाच शहरांमध्ये वाढले रूग्ण