जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा, ठाण्यात जाळपोळ; किरीट सोमय्यांनी काढलं जुनं प्रकरण
हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडल्याच्या प्रकरणात पोलीस ठाण्यात मुक्काम कराव्या लागलेल्या आमदार जितेंद्र आव्हाडांच्या अडचणीत भर पडलीये. जितेंद्र आव्हाडांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झालाय. या प्रकरणाचे पडसाद ठाण्यात उमटण्यास सुरुवात झाली असून, कार्यकर्त्यांकडून रस्त्यावर टायर जाळण्यात आल्याच्या घटना समोर आल्यात. प्रकरणावर भाजपचे नेते किरीट सोमय्यांनीही ट्विट करत आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सवाल केलाय. कळवा-खाडी […]
ADVERTISEMENT

हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडल्याच्या प्रकरणात पोलीस ठाण्यात मुक्काम कराव्या लागलेल्या आमदार जितेंद्र आव्हाडांच्या अडचणीत भर पडलीये. जितेंद्र आव्हाडांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झालाय. या प्रकरणाचे पडसाद ठाण्यात उमटण्यास सुरुवात झाली असून, कार्यकर्त्यांकडून रस्त्यावर टायर जाळण्यात आल्याच्या घटना समोर आल्यात. प्रकरणावर भाजपचे नेते किरीट सोमय्यांनीही ट्विट करत आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सवाल केलाय.
कळवा-खाडी पुलाच्या उद्धघाटन कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड यांनी आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप एका महिलेनं केलाय. महिलेनं पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर मुंब्रा पोलिसांनी जितेंद्र आव्हाडांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय.
जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ठाण्यात याचे पडसाद दिसून आले आहेत. ठाणे शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी रस्त्यावर टायर जाळून निषेध व्यक्त होऊ लागला आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर टायर जाळण्यात आल्याचे प्रकार घडले असून, यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याचं दृश्य सकाळी पाहायला मिळालं.
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने ठाणे शहरात ठिकठिकाणी जाळपोळ. pic.twitter.com/GC7mbzDavd
— पवन/Pawan ?? (@ThePawanUpdates) November 14, 2022