महाराष्ट्रावर कोरोनाचं सावट कायम, दिवसभरात ३५ हजारापेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण
कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या महाराष्ट्रावरचं कोरोनाचं सावट अजुनही कायम आहे. आज संपूर्ण राज्यात कोरोनाचे ३५ हजार ७२६ नवीन कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. आज दिवसभरात १६६ जणांनी कोरोनाशी लढताना आपले प्राण गमावले आहेत, त्यामुळे राज्यात वाढत जाणाऱ्या रुग्णसंख्येवर नियंत्रण ठेवायचं तरी कसं असा प्रश्न राज्य सरकारसमोर निर्माण झाला आहे. राज्यात सध्याच्या घडीला सक्रीय असलेल्या […]
ADVERTISEMENT

कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या महाराष्ट्रावरचं कोरोनाचं सावट अजुनही कायम आहे. आज संपूर्ण राज्यात कोरोनाचे ३५ हजार ७२६ नवीन कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. आज दिवसभरात १६६ जणांनी कोरोनाशी लढताना आपले प्राण गमावले आहेत, त्यामुळे राज्यात वाढत जाणाऱ्या रुग्णसंख्येवर नियंत्रण ठेवायचं तरी कसं असा प्रश्न राज्य सरकारसमोर निर्माण झाला आहे. राज्यात सध्याच्या घडीला सक्रीय असलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३ लाखांपेक्षा जास्त असल्यामुळे सरकारी यंत्रणांच्या चिंतेत भर पडली आहे.
औरंगाबादमध्ये ८ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत होत असलेली चिंताजनक वाढ पाहता राज्य सरकारने संचारबंदीची घोषणा केली आहे. मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक आणि इतर महत्वाच्या शहरांमध्ये प्रत्येक दिवशी रुग्णांच्या संख्येत वाढ होते आहे. ही वाढ पाहता राज्यातली आरोग्यव्यवस्था कमी पडेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाल्याचं चिंताजनक वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कॅबिनेटच्या बैठकीत केलं होतं. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मिशन बिगीन उपक्रमाअंतर्गत नवी नियमावली जाहीर केली आहे.
नागपुरात Corona चा कहर, २४ तासात ५४ रूग्णांचा मृत्यू