मी सगळ्यांना पुरून उरलोय, शिवसेनेने विसरू नये-नारायण राणे
मी सगळ्यांना पुरून उरलो आहे.शिवसेना वाढली त्यात माझा सहभाग होता, तेव्हा आत्ताचे कुणी नव्हते. माझ्याबद्दल आत्ता अपशब्द बोलणारेही कुणी नव्हते. कुठे होते काय माहित? अनिल परब अधिकाऱ्याला आदेश देत होते. तुम्ही पाहिलं असेलच त्यामुळे हे काय आहेत मी सांगेन. आत्ता काय बोलणार नाही असं म्हणत नारायण राणे यांनी शिवसेनेला सुनावलं आहे. आणखी काय म्हणाले नारायण […]
ADVERTISEMENT

मी सगळ्यांना पुरून उरलो आहे.शिवसेना वाढली त्यात माझा सहभाग होता, तेव्हा आत्ताचे कुणी नव्हते. माझ्याबद्दल आत्ता अपशब्द बोलणारेही कुणी नव्हते. कुठे होते काय माहित? अनिल परब अधिकाऱ्याला आदेश देत होते. तुम्ही पाहिलं असेलच त्यामुळे हे काय आहेत मी सांगेन. आत्ता काय बोलणार नाही असं म्हणत नारायण राणे यांनी शिवसेनेला सुनावलं आहे.
आणखी काय म्हणाले नारायण राणे?
मी जे वाक्य बोललो त्याचा काय राग आला? मी जे बोललो ते बोलणार नाही. शिवसेनेच्या नेत्यांनी काय असे शब्द उच्चारले नाहीत? 1 ऑगस्टला बीडीडी चाळ पुनर्विकास कार्यक्रम होता. त्याआधी प्रसाद लाड सेनाभवनाबाबत बोलले होते.
त्यानंतर मुख्यमंत्री काय म्हणाले? सेनाभवन बद्दल जो कुणी भाषा करेल त्याचं थोबाड फोडा. हा गुन्हा नाही का? दुसरं एक वाक्य आहे योगी आदित्यनाथाबाबत हेच उद्धव ठाकरे बोलले होते. योगी आहे की भोगी? चपलेने मारलं पाहिजे. हाच का शिवसेनेचा सुसंस्कृतपणा? तिसरं वक्तव्य केलं ते अमित शाह यांच्याबद्दल मी आणि अमित शाह यांनी चर्चा केली होती.