Narendra Modi Speech : २५ वर्षांसाठी ५ संकल्प! लालकिल्ल्यावरून मोदींनी देशाला काय सांगितलं?
आज (15ऑगस्ट २०२२) देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. ७५व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लालकिल्ल्यावर ध्वजारोहण पार पडलं. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी देशाला संबोधित केलं. आपल्या भाषणात मोदींनी पुढच्या २५ वर्षांसाठी ५ संकल्प करण्याचं आवाहनं देशवासियांना केलं. १५ ऑगस्ट निमित्त ध्वजारोहण केल्यानंतर लालकिल्ल्यावरुन बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतर संपूर्ण जगाचा […]
ADVERTISEMENT

आज (15ऑगस्ट २०२२) देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. ७५व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लालकिल्ल्यावर ध्वजारोहण पार पडलं. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी देशाला संबोधित केलं. आपल्या भाषणात मोदींनी पुढच्या २५ वर्षांसाठी ५ संकल्प करण्याचं आवाहनं देशवासियांना केलं.
१५ ऑगस्ट निमित्त ध्वजारोहण केल्यानंतर लालकिल्ल्यावरुन बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतर संपूर्ण जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोण बदलला आहे. भारताच्या भूमीत जग समस्यांवर उपाय शोधत आहे. ७५ वर्षांच्या वाटचालीचा परिपाक म्हणजे जगाची बदलेली भूमिका आणि बदलेला विचार आहे.”
पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात पुढील २५ वर्षांसाठी देशवासियांना पाच संकल्प करण्याचं आवाहन केलं. स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात नरेंद्र मोदी म्हणाले, “पुढील २५ वर्षांसाठी आपल्याला आपली शक्ती आणि सामर्थ्य पाच संकल्पावर केंद्रीत करावी लागेल. आपला अनुभव सांगतो की, जेव्हा आपण संकल्प घेऊन वाटचाल करतो, तेव्हा निश्चित ध्येय गाठतोच.”
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणते पाच संकल्प सांगितले?
१) विकसित भारत