खरं बोलणाऱ्यांवर ‘धाडी’ आणि तपास यंत्रणांचा ससेमिरा हीच मोदींची नवी लोकशाही-संजय राऊत

मुंबई तक

खरं बोलणाऱ्यांवर धाडी घालायच्या आणि त्यांच्यामागे तपास यंत्रणांचा ससेमिरा लावायचा हीच मोदींची नवी लोकशाही आणि स्वातंत्र्य आहे असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रोखठोक या त्यांच्या सदरातून मोदी सरकार आणि भाजपवर निशाणा साधला आहे. आपले पंतप्रधान लोकशाही मानतात हे गृहमंत्री अमित शाह यांना सांगावं लागलं कारण भारतात लोकशाही उरली आहे का हा संपूर्ण जगाला […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

खरं बोलणाऱ्यांवर धाडी घालायच्या आणि त्यांच्यामागे तपास यंत्रणांचा ससेमिरा लावायचा हीच मोदींची नवी लोकशाही आणि स्वातंत्र्य आहे असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रोखठोक या त्यांच्या सदरातून मोदी सरकार आणि भाजपवर निशाणा साधला आहे. आपले पंतप्रधान लोकशाही मानतात हे गृहमंत्री अमित शाह यांना सांगावं लागलं कारण भारतात लोकशाही उरली आहे का हा संपूर्ण जगाला पडलेला प्रश्न आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.

‘किती हा भाबडेपणा?’; देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना लगावला टोला

रोखठोकमध्ये आणखी काय म्हणाले आहेत संजय राऊत?

तुला काय धाड भरली आहे? या गंमतशीर वाक्प्रचाराचा अनुभव सध्या महाराष्ट्र घेतो आहे. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे की धाडींचे? असा प्रश्न पडावा इतक्या विक्रमी धाडी तपास यंत्रणांकडून पडताना दिसत आहेत. थापा मारणे हा दिल्लीतील राज्यकर्त्यांचा उद्योग होताच. आता उठसूट धाडी घालणं हा नव्या व्यवसाय त्यांनी सुरू केला आहे. बिनभांडवली धंदा आहे. पैसा जनतेचा, यंत्रणा सरकारची आणि त्यातून विरोधकांचा काटा काढायचा असे हे व्यापारी डोकं चाललं आहे.

हे वाचलं का?