अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही-जयंत पाटील
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच येत नाही असं म्हणत जयंत पाटील यांनी अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. दिल्लीतल्या शरद पवार यांच्या निवासस्थानी सुमारे अडीच ते तीन तास चाललेल्या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी ही घोषणा केली आहे. अजित पवार आणि जयंत पाटील यांना आज दिल्लीत बैठकीसाठी बोलवण्यात आलं होतं. […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच येत नाही असं म्हणत जयंत पाटील यांनी अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. दिल्लीतल्या शरद पवार यांच्या निवासस्थानी सुमारे अडीच ते तीन तास चाललेल्या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी ही घोषणा केली आहे. अजित पवार आणि जयंत पाटील यांना आज दिल्लीत बैठकीसाठी बोलवण्यात आलं होतं. ही बैठक संपल्यानंतर जयंत पाटील यांनी अत्यंत मोठी आणि महत्त्वाची घोषणा केली आहे. परमबीर सिंग यांनी केलेले आरोप हे कुणाला तरी खुश करण्यासाठी आहेत असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नाही-शरद पवार
“महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच येत नाही. अँटेलिया प्रकरणाचा तपास एनआयएकडून तर मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास एटीएसकडून सुरू आहे. या प्रकरणात जे दोषी असतील त्यांना शिक्षा होईल असा आम्हाला विश्वास आहे”
जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
There is no question of Anil Deshmukh's resignation. ATS is investigating (Antilia Case & Mansukh Hiren Case) and we believe the culprit will be punished: Jayant Patil, Nationalist Congress Party (NCP). pic.twitter.com/xfQ4yEc8ib
— ANI (@ANI) March 21, 2021
काय आहे प्रकरण?