अंगावर काटा आणणारं हिंगोलीतील दृश्य : सोयाबीन वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा नदीच्या पुरात संघर्ष
दोन आठवड्यांपूर्वी मराठवाड्यात विध्वंस घालणाऱ्या पावसाने मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना शनिवारी तडाखा दिला. हिंगोली जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झाला असून, काही नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली, तर काही ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. पावसानंतर पुरात वाहून जाणारं सोयाबीनचं पीक बाहेर काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील अनेक गावांना मुसळधार पावसाचा फटका बसला […]
ADVERTISEMENT

दोन आठवड्यांपूर्वी मराठवाड्यात विध्वंस घालणाऱ्या पावसाने मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना शनिवारी तडाखा दिला. हिंगोली जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झाला असून, काही नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली, तर काही ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. पावसानंतर पुरात वाहून जाणारं सोयाबीनचं पीक बाहेर काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील अनेक गावांना मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. यामुळे दोन आठवड्यापूर्वी झालेल्या पावसाच्या तडाख्यातून वाचलेल्या शेतमालाची माती झाली आहे.
जिल्ह्यातील अनेक भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला असून, त्यामुळे नद्यानाल्यांना पूर आला आहे. कळमनुरी तालुक्यातील कोंढुर, डोंगरगाव शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनचे ढीग कयाधू नदीला आलेल्या पुरात वाहून जात असल्याची दृश्ये समोर आली आहेत. यात एक शेतकरी शेतात जमा केलेल्या सोयाबीनचा ढीग वाचवण्यासाठी थेट पुरात उतरल्याचाही व्हिडीओ समोर आला आहे.
कयाधूच्या पुरात वाहून जात असलेला सोयाबीनचा ढीग बाहेर काढण्यासाठी शेतकरी रौद्रवतार घेतलेल्या कयाधूच्या नदीपात्रात उतरला. त्यानंतर सोयाबीनचा ढीग अडवून नदीपात्राबाहेर काढण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र, या शेतकऱ्यांला सोयाबीनचा ढीग बाहेर काढताच आला नाही.










