Mansukh Hiren प्रकरणात ठाकरे सरकार सचिन वाझेंना वाचवतं आहे-राणे
ठाकरे सरकार सचिन वाझेंना वाचवू पाहतं आहे असा आरोप भाजप खासदार नारायण राणे यांनी केला आहे. आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. तसंच मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझेंना वाचवलं जात असल्याचाही आरोप नारायण राणे यांनी केला. मनसुख हिरेन प्रकरणात नाव समोर आल्यानंतर सचिन वाझेंना का वाचवलं जातं आहे? सुशांतचा मृत्यू, […]
ADVERTISEMENT

ठाकरे सरकार सचिन वाझेंना वाचवू पाहतं आहे असा आरोप भाजप खासदार नारायण राणे यांनी केला आहे. आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. तसंच मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझेंना वाचवलं जात असल्याचाही आरोप नारायण राणे यांनी केला.
मनसुख हिरेन प्रकरणात नाव समोर आल्यानंतर सचिन वाझेंना का वाचवलं जातं आहे? सुशांतचा मृत्यू, दिशा सालियन मृत्यू, पूजा चव्हाण प्रकरण या सगळ्यामध्ये हत्या होऊनही आत्महत्या जाहीर करण्यात आली. आता मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझे यांना वाचवलं जातं आहे असाही आरोप नारायण राणे यांनी केला.
Antilia ते सचिन वाझे व्हाया मनसुख हिरेन, आजवर काय-काय घडलं?
राज्यात कायदा आणि सुव्यस्थेची परिस्थिती अत्यंत भयावह आहे. मुकेश अंबानींसारखा जगप्रसिद्ध उद्योगपती त्यांना धमकी दिली जाते. त्यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार मिळूनही काहीही शोध लागत नाही. सचिन वाझे तिथे नेमके कसे काय पोहचले? स्कॉर्पिओ मालक मनसुखची हत्या कशी काय झाली? या कोणत्याही प्रश्नांची उत्तरं ठाकरे सरकारला देता आलेली नाहीत असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे.