ठाण्यात पोलीस भरतीत गैरप्रकार करणं पडलं महागात, 5 जणांना अटक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ठाणे: ठाण्यात पोलीस भरती परीक्षेदरम्यान फसवणूक आणि इतर गैरप्रकारांमध्ये सहभागी असलेल्या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस चालक (Driver) भरतीसाठी रविवारी ठाणे आणि शेजारील पालघर जिल्ह्यात लेखी परीक्षा घेण्यात आली. यावेळी ठाण्यातील बाळकूम परीक्षा केंद्रावर गैरप्रकार करणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

अधिकाऱ्यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, ठाणे आयुक्तालयाच्या अंतर्गत या परीक्षा केंद्रांवर सुमारे 18,000 उमेदवार उपस्थित होते. याचवेळी शहरातील बाळकूम परिसरातील एका परीक्षा केंद्रावर पाच जण गैरप्रकार करताना आढळून आले.

या प्रकरणी ठाणे पोलिसांनी देवेंद्र बोरसे (धुळे), बापू गावडे (बारामती), अनिकेत पाटील (जळगाव), प्रफुल्ल मंडाले (पुणे) आणि मनोज पिंपरे (लातूर) या पाचही परीक्षार्थींविरोधात कलम 419 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कापूरबावडी पोलिसांनी याप्रकरणी गुन्ह्याची नोंद केली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

बाळकूम येथील विद्या प्रसारक विद्यालयाच्या केंद्रावर पाच विद्यार्थी आपआपसात संगनमत करुन प्रश्नपत्रिकेंमध्ये सातत्याने बदल करत होते. ही गोष्ट जेव्हा तेथील पर्यवेक्षकांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी तात्काळ बंदोबस्तावरील पोलिसांना याबाबतची माहिती दिली. हे पाचही जण प्रश्नपत्रिकेवर खुणा करुन कॉपी करण्याचा प्रयत्न करत होते.

त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात ठाणे पोलिसांच्या वतीने पाच परीक्षार्थींविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. त्यानंतर त्या पाचही जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी ठाणे पोलीस अधिक तपास करत आहेत.

ADVERTISEMENT

राज्यात शासकीय नोकऱ्यांच्या भरती प्रक्रियेला वेग

ADVERTISEMENT

राज्यात कोरोना संकटामुळे शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या अनेक परीक्षा या रद्द करण्यात आल्या होत्या किंवा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र, मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या घटत असल्याने आता राज्य सरकारने पुन्हा वेगवेगळ्या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केल्या आहेत.

सरकारने लवकरात लवकर परीक्षा घ्याव्यात अशी मागणी सातत्याने विद्यार्थ्यांकडून करण्यात येत होती. मात्र, कोरोनाचं महाभयंकर संकट घोंघावत असल्याने राज्य सरकारने अनेक परीक्षा पुढे ढकलल्या होत्या. यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा संयम सुटत चालला होता. अनेकांनी याबाबत आवाजही उठवला होता.

‘भरती परीक्षेत महाघोटाळा; आरोग्य मंत्र्यांपासून सचिवांपर्यंत सर्वांची CBI चौकशी करा’

त्यामुळे आता राज्यात वेगवेगळ्या शासकीय पदांसाठी आता परीक्षांचं आयोजन केलं जात आहे. ठाण्यात देखील पोलीस दलातील चालक पदासाठी भरती परीक्षा आयोजित करण्यात आली होती. ज्यासाठी तब्बल 18 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. लवकरच या परीक्षेचा निकाल जाहीर केला जाईल आणि त्यानंतर भरतीची पुढील प्रक्रिया पार पडेल.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT