Lok Sabha 2024 : भाजपचं ‘खेला होबे’! शिंदे, पवारांनंतर आणखी तीन नेते ‘एनडीए’त

मुंबई तक

ADVERTISEMENT

The 2024 Lok Sabha election is round the corner. NDA (BJP leadership) and UPA (Congress leadership) have started putting their respective election strategies on the ground.
The 2024 Lok Sabha election is round the corner. NDA (BJP leadership) and UPA (Congress leadership) have started putting their respective election strategies on the ground.
social share
google news

Lok Sabha Election 2024 : देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. भाजपप्रणित एनडीए आणि काँग्रेस प्रणित यूपीएने निवडणुकीच्या रणनीती काम करण्यास सुरूवात केली आहे. भाजपला आव्हान देण्यासाठी विरोधकांची एकजूट सुरू असतानाच भाजपने मोठा धक्का दिला आहे. भाजपने गेल्या काही दिवसांत राजकीयदृष्ट्या धक्कादायक निर्णय घेतले आहेत.

महाराष्ट्रासह देशात दुरावलेल्या मित्रांना महायुतीत सामावून घेण्याची मिशन भाजपने हाती घेतलं असून, एनडीएमध्ये नवे पक्ष सामील झाल्याने दुरावलेल्या मित्रांच्या पुनरागमनाचीही चर्चा सुरू आहे. त्याचा परिणाम कर्नाटकपासून आंध्र प्रदेशपर्यंत आणि उत्तर प्रदेशपासून बिहारपर्यंत दिसून येत आहे. जाणून घेऊया 2024 च्या निवडणुकीत भाजपचा प्लॅन काय आहे?

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं आव्हान निर्माण झाल्यानंतर भाजपने एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला सोबत घेतले. तरीही मविआची राजकीय ताकद कायम असल्याचे सर्व्हेमध्ये दिसून आल्यानंतर भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसमधील मोठा गट सोबत करत धक्का दिला. तसंच देशातही विरोधकांना धक्के देण्यास भाजपने सुरूवात केली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

वाचा >> NCP : अजित पवार गटाचा शरद पवारांच्या मनधरणीचा प्रयत्न पुन्हा अयशस्वी

भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी 18 जुलै रोजी दिल्लीतील एका हॉटेलमध्ये एनडीएची बैठक बोलावली आहे. यामध्ये त्या सर्व पक्षांना येण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे, जे 2024 च्या निवडणुकीत भाजपसोबत असतील. यामध्ये जुने मित्र जितनराम मांझी, चिराग पासवान, उपेंद्र कुशवाह, ओम प्रकाश राजभर यांच्या नावांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवारही पहिल्यांदाच एनडीएच्या बैठकीत सहभागी होणार आहेत. देवेगौडा यांचा पक्ष जेडीएसही आगामी काळात एनडीएमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

जयंत सिंह यांच्या पक्ष आरएलडीबाबतही चर्चा आहे. एनडीएच्या बैठकीत 20 पक्ष सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. सध्या तरी युती पक्षांचे चित्र पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही.

ADVERTISEMENT

18 जुलै रोजी बंगळुरूमध्येही विरोधकांची बैठक

23 जूनला पाटण्यात विरोधकांची बैठक झाली होती. त्यानंतर आता कर्नाटकातील बंगळुरू येथे विरोधकांची दुसरी मोठी बैठक होत आहे. 18 जुलै रोजी ही बैठक होणार आहे. त्याच्या एक दिवस आधी विरोधी पक्षांच्या नेत्यांसाठी डिनरचे आयोजन करण्यात आले आहे. संयुक्त विरोधी बैठकीसाठी 24 पक्षांना निमंत्रित करण्यात आले आहे. या बैठकीत आम आदमी पक्षाच्या सहभागाबाबत साशंकता आहे. पाटण्यात 16 पक्षांना निमंत्रित करण्यात आले होते, मात्र केवळ 15 राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते. या बैठकीला सोनिया गांधीही उपस्थित राहू शकतात.

ADVERTISEMENT

ओमप्रकाश राजभर पुन्हा एनडीएमध्ये

सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे अध्यक्ष ओमप्रकाश राजभर यांनी रविवारी एनडीए आघाडीत प्रवेश केला. त्याआधी त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. राजभर यांच्याबाबत गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू होती. आता ओमप्रकाश राजभर यांनी एनडीएमध्ये येण्यापूर्वी मोठी योजना तयार केल्याचे मानले जात आहे. त्यांचा धाकटा मुलगा अरुण राजभर याने गाझीपूर मतदारसंघातून पक्षाच्या तिकिटावर पोटनिवडणूक लढवावी, अशी त्यांची इच्छा आहे. येथे भाजप त्यांना पाठिंबा देऊ शकते. त्याचवेळी ओपी राजभर यूपी सरकारमध्ये मंत्री होणार असल्याची चर्चा आहे. यापूर्वी मोठा मुलगा अरविंद राजभर यांना भाजपकडून विधान परिषदेवर पाठवण्याची चर्चा होती. अरविंद हे सुभासपामध्ये राष्ट्रीय मुख्य सरचिटणीस आहेत.

यूपीमध्ये नव्याने रणनीती, विरोधकांना फोडण्याची तयारी

यूपीसह इतर राज्यांमध्ये पूर्वी एकत्र राहिलेले सर्व नेते भाजप आणि युतीमध्ये परतताना दिसत आहेत. दिल्लीतील सत्तेचा रस्ता यूपीमधून जातो असे म्हणतात. अशा स्थितीत लोकसभा निवडणुका जवळ येताच उत्तर प्रदेशातही नवी रणनीती आखली जात आहे. यूपीमध्ये सपा प्रमुख अखिलेश यादव यांना भाजप सातत्याने मोठे राजकीय झटके देत आहे.

वाचा >> ‘भाजप-शिवसेना युती तुटण्यामागे शरद पवारांची डील’; भुजबळांनी टाकला नवा ‘बॉम्ब’

आधी राजभर यांची सपासोबतची युती तुटली. आता रविवारी दारा सिंह चौहानही सपा सोडून भाजपमध्ये परतणार आहेत. 2022 च्या निवडणुकीपूर्वी त्यांनी सपामध्ये प्रवेश केला होता. त्यांनी आमदार पदाचा राजीनामा दिला आहे.

आरएलडीही एनडीएसोबत येणार?

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष जयंत चौधरी यांच्याबाबतही चर्चा आहे. खरंतर, ओपी राजभर यांच्यासह काही नेत्यांनी सांगितले होते की, जयंत चौधरीही भाजपसोबत जाऊ शकतात. त्यानंतर जयंत चौधरींचे काही ट्विटही व्हायरल झाले. त्याचा राजकीय अर्थही काढला जात होता. आता रविवारी एनडीएमध्ये प्रवेश केल्यानंतर ओमप्रकाश राजभर यांनीही जयंत चौधरींबद्दल मोठं विधान केलं.

राजभर यांना जयंत चौधरींबद्दल विचारले असता ते म्हणाले, “त्यांच्याबद्दल तूर्तास धीर धरा.” राजभर जयंत चौधरींच्या बाबतीत थोडा संयम ठेवा, थोडा संयम ठेवा असे वारंवार सांगत आहेत. सध्या तरी जयंत सपा आघाडी सोडून एनडीएमध्ये सामील होतात की विरोधी आघाडीत राहण्याचा निर्णय घेतात हे पाहावे लागेल.

धरमसिंग सैनीही परतणार का?

याशिवाय राजभर यांनी धरमसिंह सैनी यांच्याबाबतही मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, “मी लवकरच धरमसिंह सैनी यांना भाजपसाठी तुमच्यासमोर आणणार आहे. महत्त्वाचं म्हणजे उत्तर प्रदेश निवडणुकीच्या वेळी सैनी भाजप सोडून सपामध्ये गेले होते.

कर्नाटकात जेडीएस भाजपसोबत येण्याची शक्यता

दुसरीकडे बिहारपासून ईशान्येकडील पक्षांना आकर्षित करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. कर्नाटकात कुमारस्वामी यांचा पक्ष जेडीएस एनडीएमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चा खूप पुढे गेल्या आहेत. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते बसवराज बोम्मई म्हणतात की, आमचे राष्ट्रीय नेते आणि जेडीएस सुप्रीमो देवेगौडा यांच्यात युतीची चर्चा झाली आहे. कुमारस्वामी युतीवर आधीच बोलले आहेत. वाटाघाटी सुरू आहेत. राजकीय युतीची बोलणी सुरू आहेत.

आंध्र प्रदेशात टीडीपीसोबत युतीची चर्चा

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि टीडीपी अध्यक्ष चंद्राबाबू नायडू हे 2024 च्या निवडणुकीपूर्वी एनडीएसोबत येऊ शकतात. गेल्या महिन्यात नायडू यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. त्यानंतर तेलुगु देसम पार्टी (टीडीपी) एनडीएमध्ये परत येण्याची अटकळ सुरू झाली. अद्याप या संदर्भात दोन्ही बाजूंनी कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

वाचा >> ‘अजित पवारांना आरएसएस, नितीन गडकरी गटाचा विरोध’, पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितली सगळी स्टोरी

नायडू यांच्याशी युती करण्याबाबत अमित शाह आणि जेपी नड्डा यांच्यात चर्चा झाली आहे. मात्र, दोन्ही पक्षांमधील युतीची चर्चा रंगल्याचे वृत्त आहे. आंध्र प्रदेशात भाजप वायएसआर काँग्रेसला उघडपणे विरोध करत नाही किंवा पाठिंबाही देत नाही. अशा स्थितीत टीडीपी आघाडीबाबत पेच निर्माण झाला आहे. नायडू यांचा पक्ष यापूर्वीही एनडीएचा भाग होता.

पीएम मोदी एनडीएच्या बैठकीत असणार

एनडीएच्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित राहणार आहेत. जनसेना प्रमुख पवन कल्याण हेही या बैठकीत सहभागी होणार आहेत. पवन कल्याण हे भाजपचे मित्र आहेत आणि ते टीडीपीचेही जवळचे मानले जातात. शिवसेना, शिरोमणी अकाली दल आणि जनता दल (संयुक्त) यांच्यासह भाजपच्या इतर जुन्या आणि प्रमुख मित्रपक्षांशिवाय उद्धव ठाकरेंची एनडीएची बैठक होण्याची मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये ही पहिलीच वेळ आहे. या पक्षांनी भाजपशी संबंध तोडले आहेत.

बिहारमध्ये भाजपचे लक्ष, नितीश कुमार विरोधक एकाच व्यासपीठावर!

बिहारमध्येही भाजपच्या प्रयत्नांना यश येत आहे. नितीश कुमार यांचा पाठिंबा गमावल्यानंतर भाजप त्या पक्षांना एका व्यासपीठावर आणत आहे, जे महाआघाडीपासून वेगळे झाले आहेत. यामध्ये जीतन राम मांझी, उपेंद्र कुशवाह आणि मुकेश साहनी यांच्या नावांचा समावेश आहे. चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाला (रामविलास पासवान) एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी बोलावण्यात आले आहे.

एनडीए आणि यूपीएचे विशेष लक्ष यूपी आणि बिहारमध्येही दिसत आहे. दोन्ही राज्यात भाजप आघाडी कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. अनेक पक्षांशी युतीची चर्चा अंतिम टप्प्यात असून कधीही घोषणा होऊ शकते.

पंजाबमध्ये अकाली दलाची स्थिती काय?

पंजाबमध्ये अकाली दल सोबत येण्याचीही अटकळ होती. पण, यापूर्वी एसएडीचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनी एनडीए आघाडीत सामील होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांची राज्यात बसपासोबत युती आहे आणि ती चांगली चालली आहे. त्यामुळेच युतीबाबतच्या गोष्टी योग्य नाहीत. सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, अकाली दलाच्या एनडीएमध्ये पुनरागमनाचा पेच अडकला आहे. एसएडीला पंजाबमध्ये नव्याने जागावाटप हवे आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT