कोकणात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! सलग दोन वेळा आमदार झालेले नेते शिंदे गटात

मुंबई तक

राकेश गुडेकर, प्रतिनिधी रत्नागिरी: कोकणात शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे. चिपळूणचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणं पक्क केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेऊन आल्यानंतर माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी आज चिपळूणमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राकेश गुडेकर, प्रतिनिधी

रत्नागिरी: कोकणात शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे. चिपळूणचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणं पक्क केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेऊन आल्यानंतर माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी आज चिपळूणमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आमच्यासोबत कम्युनिकेशन गॅप झाला होता असं म्हणत पुन्हा निवडून येण्यासाठी आम्हाला लोकांची विकास कामे करणे आवश्यक आहे व त्यासाठी लागणारा निधी पुढील काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देतील असा विश्वास असल्यामुळे आपण हा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले.

सदानंद चव्हाण यांनी सांगितलं एकनाथ शिंदेंकडे जाण्याचे कारण

आगामी निवडूकीत आपण पुन्हा लढू आणि जिंकू असा विश्वास देखील व्यक्त करत लवकरच मुख्यमंत्री महोदय यांचा चिपळूण दौरा आयोजित करून आपल्यामागे असलेली ताकद दाखवू असंही त्यांनी म्हटलं आहे. भास्कर जाधव यांनी 2005 मध्ये शिवसेना सोडल्यानंतर चिपळूणमधील शिवसेनेला उर्जितावस्था देण्याचं काम सदानंद चव्हाण यांनी केलं होतं. 2009 आणि 2014 च्या विधानसभा निवडणुकीत ते आमदार म्हणून चिपळूण मतदारसंघातून निवडून आले होते. 2019 मध्ये मात्र राष्ट्रवादीच्या शेखर निकम यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. त्यातच महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आलं, आणि मोठ्या प्रमाणात विकासनिधी राष्ट्रवादीच्या आमदारांना मिळाला, मात्र आमचा मुख्यमंत्री असतानाही आमची कामं होत नव्हती अशी खंत सदानंद चव्हाण यांनी आज बोलून दाखवली. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत का जावं लागतंय हे त्यांनी स्पष्ट केलं.

सदानंद चव्हाणांनी थेट उद्धव ठाकरेंवरती केले आरोप

सदानंद चव्हाण यावेळी बोलताना म्हणाले की, राष्ट्रवादीचे इथे आमदार असल्याने त्यांच्या माध्यमातून विकासकामे होत आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल होती. तसेच पुन्हा विधानसभा निवडणुक जिंकण्याच्या दृष्टीने वाटचाल करायची असेल, तर काहीतरी बदल करायला हवा, असा सर्वांचाच आग्रह आला. आणि त्या दृष्टीने चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

हे वाचलं का?

    follow whatsapp