शिंदे आणि ठाकरे दोन्ही बाजू गुरूचरणी, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती?- दिपाली सय्यद

मुंबई तक

मुंबई: एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. महाविकास आघाडीला सुरुंग लावण्याचे काम एकनाथ शिंदे गटाने केले आहे. आपल्या सोबत ४६ आमदार असल्याचा दावा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने केला आहे. एकनाथ शिंदे गटाने बंड केल्यापासून राज्यातून विविध प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी भानविक ट्विट केले आहे. ”सन्माननीय एकनाथ […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

मुंबई: एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. महाविकास आघाडीला सुरुंग लावण्याचे काम एकनाथ शिंदे गटाने केले आहे. आपल्या सोबत ४६ आमदार असल्याचा दावा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने केला आहे. एकनाथ शिंदे गटाने बंड केल्यापासून राज्यातून विविध प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी भानविक ट्विट केले आहे.

”सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब मला शिवसेनेत घेऊन आले. माननीय उद्धवसाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) साहेबांनी मला शिवसेनेत वावरायला शिकवले. दोन्ही बाजु गुरूचरणी, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती? आमची निष्ठा प्रतिष्ठा शिवसेनेच्या चरणी भविष्यात जे होईल त्याचा स्विकार करू.” अशा आशयाचे ट्विट दिपाली सय्यद (Deepali Sayed Tweet) यांनी केले आहे.

एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत शिवसेनेतील आमदारांना घेऊन अगोदर गुजरात गाठले, त्यानंतर अर्ध्यारात्री आसामला गेले. आसाममधील एका हॉटेलमध्ये हे सर्व आमदार थांबलेले आहेत. तिकडून ते पत्र व्यवहार करत आहेत. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मी राजीनामा द्यायला तयार आहे फक्त तुमची भूमिका मला समोर येऊन सांगा. त्यानंतर एकवाथ शिंदेंनी वेळ निघुन गेली आहे असे म्हणत हा प्रस्ताव नाकारला.

मुख्यमंत्र्यांच्या कालच्या भाषणानंतर एकवाथ शिंदेंनी खालील प्रतिक्रिया दिली होती.