धाराशिवमध्ये मोठा राडा, काँग्रेस अन् ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; ZP निवडणुकीनंतर वाद उफाळला VIDEO
Dharashiv Politics : कळंब शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन गट आमनेसामने आले आणि बाचाबाचीचे रूपांतर काही क्षणांतच धक्काबुक्की, शिवीगाळ आणि मारहाणीत झाले. जिल्हा परिषद निवडणुकीतील प्रचारादरम्यान निर्माण झालेल्या वादातून हा प्रकार उफाळून आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
धाराशिवमध्ये मोठा राडा
काँग्रेस अन् ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
जिल्हा परिषद निवडणुकीनंतर वाद उफाळला
Dharashiv Politics, गणेश जाधव : धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरात जिल्हा परिषद निवडणुकीनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून शनिवारी रात्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. अचानक उफाळलेल्या या राड्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. विशेष म्हणजे हा प्रकार पोलिसांच्या उपस्थितीतच घडल्याने चर्चांना उधाण आले आहे.
कळंब शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन गट आमनेसामने आले आणि बाचाबाचीचे रूपांतर काही क्षणांतच धक्काबुक्की, शिवीगाळ आणि मारहाणीत झाले. जिल्हा परिषद निवडणुकीतील प्रचारादरम्यान निर्माण झालेल्या वादातून हा प्रकार उफाळून आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
हेही वाचा : अॅडिशनल प्रोफेसरने MD निवासी डॉक्टरवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप, तात्काळ निलंबनाचे आदेश...
जिल्हा परिषद निवडणुकीत मस्के कुटुंबातील वर्षा मस्के या डिकसळ जिल्हा परिषद मतदारसंघातून ठाकरे गटाकडून निवडणूक लढवत होत्या. त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून शीतल वनकळस या उमेदवार होत्या. प्रचारादरम्यान काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी पांडुरंग कुंभार यांनी वर्षा मस्के यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवत काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार केला होता.










