कर्नाटक निवडणुकांच्या तोंडावर सीमावाद पुन्हा चिघळणार? बोम्मईंनी शिंदेंना डिवचलं, दिला इशारा

मुंबई तक

महाराष्ट्रातील शिंदे सरकारने अलीकडेच कर्नाटकातील 865 सीमावर्ती गावांमध्ये ‘महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना’ लागू करण्याची घोषणा केली आहे.

ADVERTISEMENT

Dispute started between Maharashtra-Karnataka government over Jan Arogya Yojana. Basavaraj Bommai's warning to Shinde government
Dispute started between Maharashtra-Karnataka government over Jan Arogya Yojana. Basavaraj Bommai's warning to Shinde government
social share
google news

Karnataka-Maharashtra Border dispute :

कर्नाटक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बेळगाव सीमावाद पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. कर्नाटकमधील (Karnataka) 865 गावांसाठी महात्मा फुले जनआरोग्य सेवा योजनेचा लाभ देण्याचा महाराष्ट्र सरकारचा (Shinde government) आदेश संघीय व्यवस्थेला धोका निर्माण करणारा आहे. हा आदेश तात्काळ मागे न घेतल्यास कर्नाटक सरकारही पावलं उचलणार असल्याचा इशारा, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्र सरकारला दिला आहे. सलग 5 ट्विट करुन त्यांनी भूमिका स्पष्ट केली. (Dispute between Maharashtra-Karnataka government over Jan Arogya Yojana. Basavaraj Bommai’s warning to Shinde government)

काय आहे नेमकं प्रकरण?

महाराष्ट्रातील शिंदे सरकारने अलीकडेच कर्नाटकातील 865 सीमावर्ती गावांमध्ये ‘महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना’ लागू करण्याची घोषणा केली आहे. यासाठी अतिरिक्त 54 कोटी रुपयांची तरतुदही केली आहे. याबाबतचा सरकारी आदेश (जीआर) सोमवारी जारी केला आहे. महाराष्ट्र सरकारच्या याच निर्णयावरुन सध्या वाद सुरु झाला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp