देहू: ‘फडणवीस स्वत:ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीच समजतात’, अजितदादांना भाषण न करु दिल्याने NCP नेत्या भडकल्या
मुंबई: ‘फडणवीस साहेब हे स्वत:ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीच समजतात. मी पुन्हा येईन.. मी पुन्हा येईन.. ते आपण गेली अडीच वर्ष आपण पाहतोय. परंतु देशाच्या पंतप्रधानाला याचं भान असणं आवश्यक होतं की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जर नाही तर उपमुख्यमंत्री उपस्थित असतील तर त्यांना भाषण करु देणं आवश्यक होतं.’ अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी टीका केली […]
ADVERTISEMENT

मुंबई: ‘फडणवीस साहेब हे स्वत:ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीच समजतात. मी पुन्हा येईन.. मी पुन्हा येईन.. ते आपण गेली अडीच वर्ष आपण पाहतोय. परंतु देशाच्या पंतप्रधानाला याचं भान असणं आवश्यक होतं की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जर नाही तर उपमुख्यमंत्री उपस्थित असतील तर त्यांना भाषण करु देणं आवश्यक होतं.’ अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी टीका केली आहे.
देहूमधील कार्यक्रमात फक्त विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान मोदींचीच भाषणं झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वगळण्यात आलं. त्यांना भाषणाची संधीच देण्यात आली नाही. ज्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संतप्त झाले आहेत. साम टीव्हीशी बोलताना विद्या चव्हाण यांनी देखील पंतप्रधानांवर टीका केली आहे.
पाहा विद्या चव्हाण नेमकं काय म्हणाल्या:
‘फडणवीस साहेब हे स्वत:ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीच समजतात. मी पुन्हा येईन.. मी पुन्हा येईन.. ते आपण गेली अडीच वर्ष आपण पाहतोय. परंतु देशाच्या पंतप्रधानाला याचं भान असणं आवश्यक होतं की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जर नाही तर उपमुख्यमंत्री उपस्थित असतील तर त्यांना भाषण करु देणं आवश्यक होतं. मात्र, त्यांनी ते करु दिलेलं नाही.’ अशी टीका विद्या चव्हाण यांनी केली.