नवनीत राणांना कोठडीत हीन वागणूक देण्यात आली? गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले….

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राजद्रोहाच्या कलमाखाली अटकेत असलेल्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी तुरूंगात हीन वागणूक दिली जात असल्याचा आरोप केला आहे. एवढंच नाही तर आपल्याला खालच्या जातीची असल्याने पाणी दिलं जात नाही, वॉशरूमलाही जाऊ दिलं नाही असाही आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. यासंबंधीचं एक पत्रच नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना लिहिलं आहे. आता या प्रकरणी महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले आहेत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

खासदार नवनीत राणा यांनी जे आरोप केले आहेत त्याबाबत मी स्वतः चौकशी केली. त्या म्हणत आहेत तसं काहीही घडलेलं नाही. त्यांना कोणतीही हीन वागणूक देण्यात आलेली नाही. राणा दाम्पत्यावर झालेली कारवाई ही पूर्णपणे कायदेशीर आहे मी याबाबत अधिक काही बोलणार नाही. कारण त्यांनी याबाबत लोकसभा अध्यक्षांकडे याबाबत तक्रार केली आहे. यासंदर्भात तथ्यांवर आधारित माहिती आमच्याकडे ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे. ही माहितीही लवकरच पाठवण्यात येईल” असंही दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.

रामदेव बाबाच्या शिबिरात भेट अन्…; नवनीत राणा आणि रवी राणांच्या लव्हस्टोरीचा किस्सा

ADVERTISEMENT

लोकसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात नवनीत राणा यांनी काय म्हटलं आहे?

ADVERTISEMENT

आपण मागासवर्गीय असल्याने पोलिसांनी आपल्याला पाणी दिलं नाही. माझ्या जातीवरून माझा पोलीस ठाण्यात छळ करण्यात आला. मी खालच्या जातीची असल्याने मला बाथरूम वापरण्यास मनाई करण्यात आली. रविवारीही एक ट्विट करून नवनीत राणा यांनी शिवसेनेवर आरोप केला होता. आपण मागासवर्गीय असल्याने आपल्याला चांगली वागणूक दिली जात नाही असा आरोप नवनीत राणा यांनी केला होता. त्यासंदर्भातलं एक ट्विटही त्यांनी केलं होतं.

रवी राणा आणि नवनीत राणा यांनी हनुमान चालीसा मातोश्री समोर पठण करणार असल्याची घोषणा केली. त्यावरून चांगलाच राडा झाला. त्या प्रकरणात या दोघांनाही शनिवारी अटक करण्यात आली. या दोघांनाही २९ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. शिवसेनेने २०१९ ला हिंदुत्वाशी तडजोड करत काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकार स्थापन केलं. असा आरोप नवनीत राणांनी केला आहे. तसंच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यात संकटं वाढली आहेत म्हणून हनुमान चालीसा म्हणणार असल्याचं म्हटलं होतं. त्यावरून बराच राडा झाला ज्यानंतर नवनीत राणा आणि रवी राणा या दोघांना अटक करण्यात आली.

आता या सगळ्याबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. नवनीत राणा यांनी जे आरोप केले आहेत त्यामध्ये तथ्य नाही. मी स्वतः यासंदर्भातली चौकशी केली आहे. नवनीत राणा म्हणतात तशी वागणूक त्यांना मिळालेली नाही असंही दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT