बजेटनंतर अजित पवारांनी महाराष्ट्राला दिली ‘शॉक’ देणारी बातमी…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Ajit Pawar reaction on Maharashtra Budget :

मुंबई : राज्याचा अर्थसंकल्प सादर होताच विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी संपूर्ण महाराष्ट्राला शॉक देणारी बातमी दिली. २५ मार्चला अधिवेशन संपताचं १ एप्रिलपासून महाराष्ट्रात ३० ते ३५ टक्के वीज दरवाढ होणार असल्याचा गौप्यस्फोट पवारांनी केला. युती सरकारचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सादर केला. यानंतर अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना अजित पवार बोलत होते. (Opposition Leader Ajit Pawar reaction on budget presented by Finance Minister Devendra Fadnavis)

अर्थसंकल्प म्हणजे चुनावी जुमला :

अजित पवार म्हणाले, आजचा अर्थसंकल्प म्हणजे केवळ चुनवी जुमला आहे. दुरदृष्टीचा अभाव, वास्तवाचा भान नसलेला हा अर्थसंकल्प आहे. स्वप्नांचे इमेले, शब्दांचे फुलेरे आणि घोषणांचा सुकाळ या अर्थसंकल्पात आहे. राज्याची परिस्थिती किती, उत्पन्न किती? पैसा कसा येणार आहे, खर्च किती होणार आहे? याचा ताळमेळ नाही, राज्याची परिस्थिती पाहिल्यास राज्य कर्जबाजारी होत आहे. साडेसहा लाख कोटींच्या पुढे कर्ज गेलेलं आहे. त्याबद्दल ठोसं असं काही सांगायला अर्थमंत्री तयार नाहीत, अशी टीका पवारांनी केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

विकासाचं पंचामृत कधी दिसणार नाही :

बोलणाऱ्यांना आणि ऐकणाऱ्या बरं वाटवं यासाठी आतापर्यंत जशा घोषणा दिल्या गेल्या तशा घोषणांची पुनरावृत्ती आज घडून आली आहे. माझ्याकडे गत अर्थसंकल्पाची प्रत आहे. आम्ही त्यात विकासाची पंचसुत्री दिली होती. आता यांनी पंचामृत आणलं आहे. वास्तविक अमृत कधी कोणी बघितलेलं नाही. फक्त ऐकत आलो आहे. तसंच हे विकासाचं पंचामृत कधी दिसणार नाही. फक्त ऐकतं राहायचं आणि जनतेला स्वप्नांच्या दुनियेत फिरवून आणण्याचा प्रयत्न करायचा, असाही हल्लाबोल पवारांनी केला.

Maharashtra Budget 2023 : महिलांना एसटीत ५० टक्के सूट; शिंदे सरकारचा निर्णय

ADVERTISEMENT

महाराष्ट्राबाहेर चाललेले उद्योग थांबविण्यासाठी काय केलं?

२०१४ पासून यांनी आतापर्यंत केलेल्या या आधीच्या घोषणांचं काय झालं? शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं का? महाराष्ट्रातील उद्योग मोठ्या प्रमाणावर बाहेर चालले आहेत. ते थांबविण्यासाठी कोणत्याही उपाययोजना नाहीत. आपल्या जिल्हा नियोजन समितीचा खर्च फक्त ३५ टक्के झालेला आहे. काही जिल्ह्यात केवळ ४ ते ५ टक्के पैसे खर्च झाले आहेत, असंही पवार म्हणाले.

ADVERTISEMENT

ठोसं काहीच उल्लेख नाही :

वेगवेगळ्या स्मारकांना महापुरुषांच्या कामाला निधी देण्याचा घोषणा केली. पण ठोस निधीची घोषणा नाही. आम्ही करणार आहोत, आम्ही करु. अनेक महामंडळांचा उल्लेख केला, त्याला भरीव तरतुद करणार. फक्त करणार. ठोसं काहीच उल्लेख नाही. अनेक प्रकल्पांचा पुनरुच्चार झाला. पुरंदरचं विमानतळ करु. अरे करणार म्हणजे नेमकं काय? कोल्हापूर, शिर्डी. छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळांबाबत काय? याचा उल्लेख नाही. कल्याण डोंबिवली महापालिकेला तत्कालिन मुख्यमंत्री फडणवीस यांनी साडे सहा हजार कोटींची तरतुद केली होती. पण त्यातील दमडीही मिळाली नव्हती. तसाचं हा अर्थसंकल्प आहे.

Maharashtra Budget 2023 : शेतकऱ्यांना वर्षाला 12 हजार; फडणवीसांची मोठी घोषणा

राज्यातील जनतेला वीज दरवाढीचा शॉक :

दरम्यान, यावेळी बोलताना अजित पवार यांनी संपूर्ण महाराष्ट्राला शॉक देणारी बातमी दिली आहे. २५ मार्चला अधिवेशन संपताचं १ एप्रिलपासून महाराष्ट्रात ३० ते ३५ टक्के वीज दरवाढ होणार असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. मला माहिती मिळाली की २५ तारखेला अधिवेशन संपलं की १ एप्रिलला जनतेला एप्रिल फूल नाही तर झटका मिळणार आहे. राज्यात ३० ते ३५ विजेची दरवाढ होणार आहे, असे ते म्हणाले.

एका माणसाला ३ रुपये?

शेतकऱ्यांना सहा हजार रुपये जाहीर केले आहेत. एका शेतकऱ्याच्या कुटुंबात पाच माणसं धरा. म्हणजे त्यांना ३ रुपये रोज मिळणार आहेत. ३ रुपये देऊन तुम्ही शेतकऱ्यांची थट्टा करत आहात का? शेतकऱ्याला असल्या मदतीची गरज नाही. त्याऐवजी त्याचा कांद्याला, हरभऱ्याला, सोयाबिन, कापूस, गहू, आंबा, संत्रा, केळी अशा वेगवेगळ्या पिकांना चांगल्याप्रकारचा भाव द्या. कांद्याला पैसे नाहीत, अनुदान नाही, काही घोषणा नाही. वास्तविक शेजारच्या गुजरात सरकारने घोषणा केली, पण आपल्याकडे नाही, अशी खंत पवारांनी बोलून दाखविली.

Maharashtra Budget 2023 : शिंदे-फडणवीसांकडून महापालिका निवडणुकीसाठी ‘मत’पेरणी!

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल १४ मार्चला विरोधात जाणार?

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल १४ मार्चला विरोधात जाणार हे त्यांना बहुतेक कळलं आहे. त्यामुळे आपल्याला अर्थसंकल्पात जेवढ्या काही घोषणा करता येतील तेवढ्या करु घेऊ. किंवा शिक्षक आणि पदवीधरमध्ये, कसब्यामध्ये जो काही झटका बसला. त्यामुळे जनता आपल्यासोबत नाही, हे कळलं आहे. खेडच्या सभेमध्येही हे दिसून आलं, आदित्य ठाकरेंच्या सभेत दिसून आलं. या हेतून मांडलेला हा दुरदृष्टीचा अभाव आणि वास्तवाचं भान नसलेला हा अर्थसंकल्प आहे, अशीही घणाघाती टीका पवारांनी केली.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT