शरद पवारांची अदाणींसाठी बॅटिंग, राहुल गांधींचंही प्रत्युतर… पण वेगळ्याच स्टाइलमध्ये!

मुंबई तक

ADVERTISEMENT

rahul gandhi again attack on adani
rahul gandhi again attack on adani
social share
google news

मुंबई: अदाणी आणि मोदींचं नातं काय? असा प्रश्न करून राहुल गांधींनी लोकसभेत हल्लाबोल केला होता. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशनच अदाणींवरून पाण्यात वाहून गेलं. त्याच अदाणींच्या मुद्यावरून शरद पवारांनीही विरोधी पक्षांना खडेबोल सुनावले. पवारांनी अदाणींवरून अप्रत्यक्षपणे राहुल गांधींना सुनावल्याचं म्हटलं गेलं. त्याचवेळी आता राहुल गांधींचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. राहुल गांधी नेमकं काय म्हणालेत आणि त्याचं टायमिंग काय सांगतं, हे आपण सविस्तर पाहूयात. (rahul gandhi again attack on adani and answered to sharad pawar but in a different style)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एनडीटीव्हीला दिलेली मुलाखत शुक्रवारी 7 एप्रिलला रोजी प्रकाशित झाली. याच मुलाखतीनंतर महाराष्ट्रचं नाही, तर देशाच्या राजकारणात वादळ निर्माण झालं. पवारांनी अदाणी वादावर सविस्तर भूमिका मांडली. विरोधी पक्षांनी अदाणींच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समितीची मागणी केली. पण सरकारने ही मागणी मान्य केली नाही. याबद्दलच शरद पवार म्हणाले, जेपीसीत बहुमताच्या आधारावर निर्णय होतो. तिथे सत्ताधाऱ्यांचं बहुमत असतं. त्यामुळे पारदर्शकपणे निर्णय होण्याची शक्यता नसते. म्हणूनच जेपीसीऐवजी सुप्रीम कोर्टाच्या समितीनं चौकशी करणं अधिक योग्य असल्याचं माझं म्हणणं आहे.

अधिक वाचा- अदाणींची पाठराखण करताच गदारोळ, शरद पवारांनी बोलावली तातडीची पत्रकार परिषद; म्हणाले…

तसंच अदाणी-अंबानींवर आरोप करणाऱ्यांनाही पवारांनी खडे बोल सुनावले आहेत. आता याच सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींची प्रतिक्रिया समोर आली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

शरद पवारांच्या मुलाखतीनंतर राहुल गांधींचं अदाणींविरोधात ट्विट

राहुल गांधी लिहितात, ‘सच्चाई छुपाते हैं, इसलिए रोज़ भटकाते हैं! सवाल वही है – अडानी की कंपनियों में ₹20,000 करोड़ बेनामी पैसे किसके हैं?’

ADVERTISEMENT

यानंतर त्यांनी एक फोटोही जोडला ज्यामध्ये अदाणी असे लिहिले होते, पण त्याच अक्षरांनी इतर अनेक नावेही लिहिली होती. ज्यामध्ये गुलाम नबी आझाद, सिंधिया, किरण कुमार रेड्डी, हिमंता बिस्वा सरमा आणि अनिल अँटोनी यांची नावे आहेत.

ADVERTISEMENT

‘या’ पाच नेत्यांवर निशाणा साधला अन् पवारांनाही..

गुलाम नबी आझाद: अनेक दशकांपासून ज्येष्ठ काँग्रेसी म्हणून ओळख असलेले गुलाम नबी आझाद गेल्या वर्षी ऑगस्ट 2022 मध्ये काँग्रेसचे माजी सदस्य झाले. अनेक दिवसांच्या नाराजीनंतर त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आणि देशातील या सर्वात जुन्या पक्षाच्या सध्याच्या नेतृत्वावर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. नुकतेच त्यांचे आत्मचरित्र आले, त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी काँग्रेस सोडण्याचे कारण राहुल गांधी हेच असल्याचे सांगितले. आझाद म्हणाले, ‘फक्त मीच का, राहुल गांधींमुळे अनेक काँग्रेसवाले वेगळे झाले आहेत. ते म्हणाले की, या पक्षात येण्यासाठी कणाहीन असणे आवश्यक आहे. त्यांनी पीएम मोदींचे कौतुक केले आणि त्यांना मेहनती म्हटले होते. काँग्रेसपासून वेगळे होऊन गुलाम नबी आझाद यांनी डेमोक्रॅटिक आझाद पार्टी या नव्या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे.

अधिक वाचा- शरद पवारांची ‘ती’ मुलाखत, अजित पवार खरंच नॉट रिचेबल?; पुन्हा राजकीय भूकंपाची चर्चा

ज्योतिरादित्य सिंधिया: अदाणींच्या नावातील ‘डी’वरून राहुल गांधींनी कधीकाळी त्यांचे जवळचे मित्र असलेल्या ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यावर निशाणा साधला आहे. सध्या, गांधी कुटुंबाची केंद्रीय मंत्री सिंधिया यांच्या कुटुंबाशी दोन पिढ्यांपासून मैत्री आहे, परंतु मार्च 2020 मध्ये सिंधिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मैत्रीची मुळे कमकुवत झाली असतील, पण सिंधिया यांनी कधीही थेट राहुल गांधींवर निशाणा साधला नाही. राहुल गांधींच्या विधानांनाही त्यांनी काँग्रेसचा अंतर्गत मुद्दा म्हणून बाजूला सारले. काँग्रेसवाल्यांनी त्यांना अनेकदा स्वार्थी आणि देशद्रोही म्हटले असले तरी सिंधिया या विधानांकडे कधीच लक्ष देताना दिसले नाहीत. मात्र, शुक्रवारी ग्वाल्हेरमधील एका मंचावरून त्यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, “काँग्रेसकडे एकच विचारधारा उरली आहे ती म्हणजे देशद्रोही, देशाच्या विरोधात काम करणारी विचारधारा.” ते ट्विटरवर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनाही भिडले होते. या वक्तव्यानंतर राहुल गांधींनी ट्विटद्वारे त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

किरण कुमार रेड्डी: गुलाम नबी आझाद आणि सिंधिया यांच्यावर हल्ला केल्यानंतर, काँग्रेसचे पुढचे माजी सदस्य किरण कुमार रेड्डी राहुल गांधींच्या निशाण्यावर आले. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांनी शुक्रवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. रेड्डी यांना केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी भाजपचे सदस्यत्व दिले. किरण रेड्डी यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. ते म्हणाले, ‘काँग्रेस सोडावी लागेल, असे मला कधीच वाटले नव्हते. माझे काँग्रेसशी प्रदीर्घ काळचे नाते आहे. पक्ष नेतृत्वाच्या चुकीच्या धोरणामुळे पक्ष सतत डबघाईला येत आहे. कार्यकर्त्यांचे ऐकले जात नाही आणि ही केवळ एका राज्याची गोष्ट नाही, तर संपूर्ण देशातील पक्षाची ही कहाणी आहे.’

हिमंता बिस्वा सरमा: ईशान्येत काँग्रेसचा झेंडा उंच ठेवण्यासाठी हिमंता बिस्वा सरमा हे नेहमीच महत्त्वाचे नाव राहिले आहे. 2011 मध्ये काँग्रेसने आसाममध्ये स्वत:च्या बळावर सरकार स्थापन केले, पण हिमंताच्या म्हणण्यानुसार, त्यांना कधीही तो दर्जा मिळाला नाही. राहुल गांधी यांनी अनेकवेळा भेटीची वेळ दिली नसल्याचा आरोपही त्यांनी केला. नंतर ते 2015 मध्ये भाजपमध्ये दाखल झाले आणि आता आसामचे मुख्यमंत्री आहेत. राहुल गांधींवर निशाणा साधण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. त्यांनी नुकतेच राहुल गांधींवर निशाणा साधला होता आणि त्यांच्यासाठी कोणालाच वेळ नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे राहुल गांधींनी त्यांच्या ट्विटमध्ये त्यांचे नाव घेतले आहे.

अधिक वाचा- Ajit Pawar: नॉट रिचेबल असलेले अजितदादा नेमके होते तरी कुठे?; म्हणाले, पित्त…

अनिल अँटनी : नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या अनिल अँटोनी यांच्यावर राहुल गांधींनी निशाणा साधला आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी संरक्षण मंत्री एके अँटनी यांचा मुलगा अनिल अँटनी यांनी गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला. जानेवारीमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील बीबीसीच्या एका वादग्रस्त माहितीपटावर टीका करणाऱ्या त्यांच्या ट्विटनंतर काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. अनिल अँटोनी यांनी ट्विट केले की, ‘भाजपसोबत अनेक मतभेद आहेत, मात्र असे असूनही देशाच्या सार्वभौमत्वावर परिणाम होईल.’ अनिल अँटोनी यांच्या या ट्विटनंतर काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. पंतप्रधान मोदींना घेरण्यात गुंतलेले काँग्रेस नेते अनिलवर हे ट्विट हटवण्यासाठी दबाव आणत होते. त्यामुळेच त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अशात ते राहुल गांधींच्या निशाण्यावर आले.

एकीकडे शरद पवार आपल्या मतावर ठाम असल्याचं दिसत आहेत. तर दुसरीकडे राहुल गांधीही मागे हटण्यास तयार नाहीत. एकप्रकारे यानिमित्तानं सगळ्यात मोठ्या विरोधी पक्षाचा नेता आणि सर्वांत अनुभवी नेताच आमनेसामने आले आहेत. त्यामुळे 2024 च्या निवडणुकीत विरोधी पक्षांच्या एकजुटीला मोठा झटका बसल्याचंही म्हटलं जातं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT