Raj Thackeray : राज ठाकरे खोटं बोलले?, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कुणी बांधली?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा अनेक कारणांनी चर्चेत आहे. यातील एक मुद्दा म्हणजे लोकमान्य टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी बांधल्याचं विधानं. राज ठाकरेंच्या या वक्तव्यावरूनच राज्यात वाद रंगला आहे. राज ठाकरे यांच्या विधानाबद्दल इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी महत्त्वाचं मत मांडलं आहे. राज ठाकरेंचं विधान काय? “तुमच्या मतांच्या राजकारणासाठी हे सगळं ध्रुवीकरण […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा अनेक कारणांनी चर्चेत आहे. यातील एक मुद्दा म्हणजे लोकमान्य टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी बांधल्याचं विधानं. राज ठाकरेंच्या या वक्तव्यावरूनच राज्यात वाद रंगला आहे. राज ठाकरे यांच्या विधानाबद्दल इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी महत्त्वाचं मत मांडलं आहे.
राज ठाकरेंचं विधान काय?
“तुमच्या मतांच्या राजकारणासाठी हे सगळं ध्रुवीकरण करायचं आहे. मग एवढचं आहे, तर मग रायगडावरची समाधी ही कुणी बांधली? शिवछत्रपतींची समाधी कुणी बांधली, ती आमच्या लोकमान्य टिकळांनी बांधली. टिकळांना तुम्ही आता काय ब्राह्मण म्हणून बघणार आहात का? टिकळांनी जे पहिलं वर्तमानपत्र काढलं त्याचं नाव काय… मराठा. हे पवारसाहेब कधी सांगणार नाहीत,” असं ठाकरे म्हणाले.
इंद्रजित सावंत काय म्हणाले?