गुलाबभाऊ सत्तेच्या जोरावर ३० वर्ष मलिदा खाल्ला तरी पाझर का फुटत नाही? सुषमा अंधारे

मुंबई तक

जळगाव : पाच आमदार शिंदे गटात गेले म्हणून जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेची ताकद कमी झाली असं नाही. सत्ता असतानाही यांना वाय प्लस सुरक्षा घेवून फिराव लागतं आहे. यातच काय ते उत्तर आलं, असं म्हणतं जळगावमध्ये शिवसेनेची ताकद अद्याप कायम असल्याचा दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला. त्या आजपासून जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

जळगाव : पाच आमदार शिंदे गटात गेले म्हणून जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेची ताकद कमी झाली असं नाही. सत्ता असतानाही यांना वाय प्लस सुरक्षा घेवून फिराव लागतं आहे. यातच काय ते उत्तर आलं, असं म्हणतं जळगावमध्ये शिवसेनेची ताकद अद्याप कायम असल्याचा दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला. त्या आजपासून जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या असून बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात त्यांची सभा होणार आहे.

‘त्याची’ उत्तर तुमच्याकडे आहे का?

यावेळी माध्यमांशी बोलताना सुषमा अंधारे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या टीकेवर उत्तर दिलं. सुषमा अंधारे या तीन महिन्यांपूर्वी शिवसेनेत आलेलं बाळ आहे, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली होती. त्यावर बोलताना त्या म्हणाल्या, सुषमा अंधारे तीन महिन्यांचा बाळ आहे का? सुषमा अंधारे टीका करते का? यापेक्षा सुषमा अंधारे तुम्हाला जे प्रश्न विचारते त्याची उत्तर तुमच्याकडे आहे का? असा प्रतिसवाल त्यांनी आमदार पाटील यांना केला.

होय मी टीका करत होते, मात्र एकदाही आम्ही उध्दव ठाकरे यांचा हात कधी सोडला नाही. पण गुलाब भाऊ तीस वर्ष सत्तेच्या जोरावर मलिदा खाल्ला तरी तुम्हाला पाझर का फुटत नाही, असा खोचक सवालही सुषमा अंधारे यांनी केला.

सर्व प्रकल्प गुजरातमध्ये नेत आहेत. महाराष्ट्राला कंगाल करण्याचं काम सुरू आहे. यासाठी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे, मात्र मुंबई व सिंधुदुर्ग महाराष्ट्रपासून वेगळं करण्याचा भाजपचा कुटील डाव आहे. यात एकनाथ शिंदे अळीमिळी चूप करून बसले आहेत, याच वाईट वाटतं आहे, अशी खंत त्यांनी बोलून दाखविली.

हे वाचलं का?

    follow whatsapp