“घाईने मधुचंद्र आटोपला! लग्नच करायचे विसरले..” शिंदे-फडणवीस सरकारवर शिवसेनेची टीका
महाराष्ट्रात शिवसेनेत दोन गट पडले आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेना दुभंगली आहे. आता एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट असे दोन गट पडले आहेत. एकनाथ शिंदे हे भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले आहेत. अशात सामनाच्या अग्रलेखातून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करण्यात आली आहे. घाईने मधुचंद्र उरकला पण लग्न करायला विसरले अशी खोचक टीका सामनाच्या […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात शिवसेनेत दोन गट पडले आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेना दुभंगली आहे. आता एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट असे दोन गट पडले आहेत. एकनाथ शिंदे हे भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले आहेत. अशात सामनाच्या अग्रलेखातून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करण्यात आली आहे. घाईने मधुचंद्र उरकला पण लग्न करायला विसरले अशी खोचक टीका सामनाच्या (Saamana) अग्रलेखातून करण्यात आली आहे.
काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात?
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षचा फैसला आता जवळ आला आहे. या प्रकरणात काय घडलं की घाईने मधुचंद्र तर केला पण लग्न करायचे विसरलो अशी शिंदे गटाची अवस्था झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्राची राजकीय राजकीय प्रकृती बिघडली होती. पण ज्यांच्या फुटिरतेमुळे किंवा विश्वासघाताच्या डायरियामुळे राज्याची प्रकृती खालावली ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही आजारी पडले. अलिबाबा आणि चाळीस चोरांसाठी हे वृत्तही चिंताजनक आहे असे सामनामध्ये म्हटले आहे.
पुढे सामनामध्ये म्हटले ”एकनाथ शिंदे हे किमान २० ते २२ तास न झोपता काम करतात. त्यांच्या कामाचा उत्साह दांडगा आहे. कोणताही व्हायरस त्यांच्या अवतीभवती फिरत नाही. तरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजारी पडावेत हे चाळीस जणांसाठी चिंताजनक आहे. शिंदे यांना नक्की कोणता आजार जडला आहे त्यांनाच माहित पण सुप्रीम कोर्टात सध्या ज्या घडामोडी सुरू आहेत त्यामुळे अनेकांना विविध व्याधींनी ग्रासलं आहे. शिंदे आणि त्यांच्या चाळीस आमदारांनी शिवसेनेचा त्याग करून स्वतंत्र गट स्थापन केला, पण आमचीच शिवसेना खरी असा दावा त्यांनी केला. हा विनोदाचा भाग झाला असं लेखात म्हटलं आहे”.
उद्या शिंदे आणि त्यांचे लोक ग्वाल्हेरला जातील आणि जिवाजीराजे शिंदे यांच्या सर्व मालमत्तेवर हक्क सांगतील तुम्ही कसले शिंदे, तुम्ही कसले सरदार? तुम्ही अशी काय मर्दुमकी गाजवली? मीच खरा शिंदे. त्यामुळे ग्वाल्हेरचा राजा मीच. असा दावा करायलाही हे लोक कमी करणार नाहीत. त्यांची जी मानसिक अवस्था आहे ती पाहता ते लोक असे दावे करू शकतात.










