Lok Sabha 2024 : राणे-सामंत संघर्ष पेटणार की शमणार! शिंदे काय देणार ‘मेसेज’?

भागवत हिरेकर

सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघावरून शिवसेना आणि भाजपतील उदय सामंत-नारायण राणेंनी एकमेकांना लक्ष्य केलं आहे.

ADVERTISEMENT

narayan rane uday samant clashes over sindhudurg ratnagiri lok sabha constituency
narayan rane uday samant clashes over sindhudurg ratnagiri lok sabha constituency
social share
google news

Eknath Shinde Sindhudurg-Ratnagiri Lok Sabha 2024 : महाराष्ट्रातील काही लोकसभा मतदारसंघ असे आहेत, जिथे भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांच्याकडून दावे-प्रतिदावे केले जाताहेत. यात एक मतदारसंघ आहे सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा. उदय सामंत यांनी मतांचं गणित सांगत या मतदारसंघावर दावा केला. त्याला केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी उत्तर देत पहिला दावा आमचा असं सांगतानाच युतीचे मंगळसूत्र घातलेय तर पावित्र्य जपावे लागेल अशा शब्दात सुनावले. त्यात आता शिवसेनेचा शिवसंकल्प मेळावा राजापूरमध्ये होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मेळाव्यात बोलणार आहेत. लोकसभा मतदारसंघावर दावा करणार की, सामंतांना सबुरीने घेण्याचा मेसेज देणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात 2019 मध्ये शिवसेनेचे विनायक राऊत जिंकले होते. सध्या ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आहेत. पण, आता लोकसभा 2024 ची तयारी सुरू आहे. या मतदारसंघातून कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. दुसरीकडे या मतदारसंघातून नारायण राणेंना उमेदवारी दिली जाऊ शकते, अशीही चर्चा आहे. या सगळ्यात सामंत आणि राणेंनी केलेल्या विधानामुळे दोन्ही गटातील सुप्त संघर्ष समोर आला.

उदय सामंतांनी केला सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघावर दावा

काही दिवसांपूर्वी उदय सामंत म्हणालेले की, “सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघाची पार्श्वभूमी पाहता ही जागा शिवसेनेकडेच असायला हवी. या लोकसभा मतदारसंघात माझा विधानसभा मतदारसंघ आहे. माझ्या मतदारसंघातून महायुतीला सव्वालाख मते मिळतील. बाजूच्या सिंधुदुर्गमधून म्हणजेच दिपक केसरकरांच्या मतदारसंघात आमचे मोठे मताधिक्य आहे. त्यामुळे आम्ही या जागेवर दावा केला आहे.”

हेही वाचा >> “गोळी घातली की…”, ठाकरेंचा नेता ढसाढसा रडला, काय घडलं?

“ज्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार लढला असेल आणि तिथे उमेदवार बदलायचा असेल किंवा जिथे भाजपचा उमेदवार लढला असेल आणि आता बदल करायचा असेल, तर हे केवळ बोलण्याने होत नाही. आजही या जागेवर शिवसेनेचा अधिकार आहे. एकनाथ शिंदेंचा या जागेवर दावा आहे. त्यामुळे या जागेबाबत एकनाथ शिंदे घेतील, तो निर्णय आम्हाला मान्य असेल”, असे सांगत सामंतांनी शिंदेंच्या कोर्टात हा चेंडू टाकला.

हे वाचलं का?

    follow whatsapp