Vidhansabha: ’50 खोकेंचा’ प्रश्न विचारला मुख्यमंत्री शिंदेंना, पण उत्तर दिलं अजित पवारांनी!

रोहित गोळे

ठाकरेंना शिवसेना पक्षाचे 50 कोटी परत केले असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. याबाबत जेव्हा त्यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा याचं उत्तर हे अजित पवारांनी पहिल्यांदा दिलं. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

ADVERTISEMENT

ajit pawar was the first answer on shiv sena party 50 crore rupees infront of cm eknath shinde vidhansabha
ajit pawar was the first answer on shiv sena party 50 crore rupees infront of cm eknath shinde vidhansabha
social share
google news

Ajit Pawar and Eknath Shinde: मुंबई: विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचं (Monsoon Session) सूप आज (4 ऑगस्ट) मुंबईत वाजलं. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) आपल्या भाषणात जोरदार फटकेबाजी केली. पण याचवेळी 50 खोकेंवरुन त्यांच्यावर जी टीका केली जाते त्यावरुन त्यांनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं. तसंच आपणच त्यांना 50 कोटी परत केल्याचं ते यावेळी म्हणाले. दरम्यान, अधिवेशनानंतर पत्रकारांनी जेव्हा याच प्रश्नाबाबत मुख्यमंत्र्यांना विचारलं तेव्हा त्याचं उत्तर शिंदेंनी देण्याऐवजी सर्वात आधी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीच दिलं. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. (ajit pawar was the first answer on shiv sena party 50 crore rupees infront of cm eknath shinde vidhansabha )

विधानसभेबाहेर पत्रकार परिषदेत नेमकं काय घडलं?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी सभागृहाबाहेर येऊन सुरुवातीला एकूणच झालेल्या कामकाजाबाबत माहिती दिली. यानंतर पत्रकारांनी प्रश्न विचारण्यास सुरूवात केली.

प्रश्न: तुम्ही सभागृहात एक पत्र दाखवलं.. त्या पत्रात 50 कोटी परत देण्याची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. ते 50 कोटी तुम्ही त्यांना परत दिल्याचं सभागृहात म्हणाले. ते नेमकं प्रकरण काय?

दरम्यान, या प्रश्नानंतर खरं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर देणं अपेक्षित होतं. मात्र, त्याऐवजी अजित पवारांची उत्तर द्यायला सुरुवात केली.

हे वाचलं का?

    follow whatsapp