Badlapur Case: 'उद्धव ठाकरेंना इतक्या खालच्या दर्जाला जाऊन राजकारण...', फडणवीस ठाकरेंवर का संतापले?
Badlapur sexual assault case: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे हे खालच्या दर्जाचं राजकारण करत असल्याची टीका केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बदलापूरची घटनेच्या चौकशीसाठी आयजी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेत एसआयटी
बदलापूरची घटनेच्या चौकशीसाठी आयजी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेत एसआयटी
बदलापूर प्रकरणावरून फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
Badlapur school case: बदलापूर: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर आता राजकीय वार-प्रतिवार देखील सुरू झाले आहेत. बदलापूरवरील घटनेवर बोलताना उद्धव ठाकरेंनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला होता. ज्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. (badlapur case doing politics at such a low level does not suit uddhav thackeray why did devendra fadnavis get angry with uddhav thackeray)
बदलापूर घटनेवर देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
'बदलापूर येथे घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असून, निंदनीय आणि मन हेलावून टाकणारी आहे. जी घटना झालेली आहे, ती अतिशय दुर्दैवी आहे. शाळेतील दोन अतिशय लहान मुलींना त्याठिकाणच्या सफाई कर्मचाऱ्याने त्याने ज्या प्रकारे अत्याचार केलेला आहे ते अत्यंत निंदनीय आणि मन हेलावून टाकणारी घटना आहे. या घटनेचा एक मोठा उद्रेकही जनतेमध्ये पाहायला मिळतोय. या प्रकरणाची दखल मुख्यमंत्र्यांनीही घेतलेली आहे. या संदर्भात तात्काळ वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग ज्या आयजी स्तरावरच्या अधिकारी आहेत त्यांना नियुक्त केलेलं आहे.'
हे ही वाचा>> Badlapur News : ''तू अशा बातम्या देत आहेस, जणू तुझ्यावरच बलात्कार झालाय'', CM शिंदेंच्या नेत्याची मुजोरी
'महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या अंतर्गत ही चौकशी व्हावी अशी भावना या मागे आहे. त्याचप्रमाणे पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत त्यासंदर्भात जी कारवाई तातडीनं केली पाहिजे तीसुद्धा केली जात आहे. यासंदर्भात तात्काळ चार्जशीट दाखल केली जाईल असे निर्देश दिले आहेत. फास्ट ट्रॅक कोर्टाची निर्मिती करण्याचा प्रस्ताव मागवलेला आहे. कुठल्याही स्थितीत अशा नराधमांना तात्काळ शिक्षा व्हावी असा प्रयत्न राज्य सरकार आणि पोलीस विभागाचा असेल. त्यासाठी जी कारवाई करण्याची गरज आहे त्याची सुरुवात वेगाने करण्यात आली आहे.'
'मॉब जो आलेला आहे हा स्वयंस्फूर्तीने आला की कसा यावर कमेंट करणं मला योग्य वाटत नाही. उद्रेक भावनांचा असू शकतो. पण त्याठिकाणी जी काही मागणी होतेय की, तात्काळ फाशी द्या तर मला असं वाटतं की कायद्यानुसार तातडीनं जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या वतीनं केला जात आहे. मला असं वाटतं की ज्या संवेदनशीलतेनं काम केलं पाहिजे तो प्रयत्न पोलीस विभागाचाही आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारे दंगा होऊ नये हा मात्र प्रयत्न करणं गरजेचं आहे.'










