INDIA : बंगळुरुतील बैठकीनंतर उद्धव ठाकरेंचा PM नरेंद्र मोदींवर ‘वार’, म्हणाले…

मुंबई तक

देशातील विरोधी पक्षांची आज बंगळुरुत दुसरी बैठक पार पडली. या बैठकीला देशभरातील 26 विरोधी पक्षाच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. या बैठकीनंतर विरोधी पक्षानी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन बैठकीमागचा तपशील प्रसिद्धी माध्यमांना सांगितला होता.

ADVERTISEMENT

bengaluru opposition meeting udhhav thackeray criticize pm narendra modi india vs bjp
bengaluru opposition meeting udhhav thackeray criticize pm narendra modi india vs bjp
social share
google news

देशातील विरोधी पक्षांची आज बंगळुरुत दुसरी बैठक पार पडली. या बैठकीला देशभरातील 26 विरोधी पक्षाच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. या बैठकीनंतर विरोधी पक्षानी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन बैठकीमागचा तपशील प्रसिद्धी माध्यमांना सांगितला होता. या पत्रकार परिषदेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे (UBT)चे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Pm Narendra Modi) जोरदार हल्लाबोल केला आहे. (bengaluru opposition meeting udhhav thackeray criticize pm narendra modi india vs bjp)

कॉंग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखाली बंगळुरूत 26 विरोधी पक्षनेत्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीत मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun kharge) यांनी विरोधी पक्षनेत्यांच्या पक्षाच्या नावाची घोषणा केली. विरोधी पक्षाने त्यांच्या पक्षाने नाव ‘INDIA’असल्याचे जाहिर केले आहे. या ‘INDIA’चा अर्थ त्यांनी इंडियन नेशनल डेमोक्रेटीक इंक्लुसिव अलायंन्स (indian national democratic inclusive alliance) असा सांगितला आहे. यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, ठाकरे गटाचे (UBT)चे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांची पत्रकार परिषद पार पडली.

उद्धव ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्ला केला. विरोधी पक्षाची आज दुसरी मिटींग यशस्वी झाल्याचे उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीला म्हटले. काही लोकांना वाटतंय कुटुंबासाठी लढतायत,पण हा देश आमचं कुटुंब आहे, त्यामुळे आम्ही कुटुंबासाठी लढतोय. या कुटुंबाला आम्हाला वाचवायचं आहे असे ठाकरे म्हणाले आहेत.

हे ही वाचा : Kirit Somaiya यांचा ठाकरेंकडून तीनदा ‘गेम’, अमित शाहांसमोरच..; नेमका वाद काय?

देशातील हुकुमशाहीविरोधात आम्ही एकत्र आलो आहोत, आम्ही वेगळ्या विचाराचे असलो तर आम्ही देशासाठी एकत्र आलो आहोत. देशातील जनता हे आमचे कुटुंब आहे, आणि या कुटुंबाला वाचवण्यसाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp